शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी गौरव : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञतेचा नमस्कार ‘साहित्यतीर्थ’क्षेत्री कीर्तिवंतांवर कौतुकाचा अभिषेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:37 IST

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या साहित्यतीर्थावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आपापल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापित करणाºया व्यक्तिमत्त्वांवर कौतुकाचा अभिषेक घालण्यात आला.

ठळक मुद्देआठही कर्तृत्ववान व्यक्तींना मनोभावे कृतज्ञतेचा नमस्कार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या साहित्यतीर्थावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आपापल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापित करणाºया व्यक्तिमत्त्वांवर कौतुकाचा अभिषेक घालण्यात आला आणि शुभ्रधवल सद्गुणांचा प्रवाह गोदावरीत येऊन मिसळला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि.१०) सायंकाळी रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘गोदावरी गौरव’चे वितरण करण्यात आले आणि उपस्थित अवघ्या नगरजनांनी आठही कर्तृत्ववान व्यक्तींना मनोभावे कृतज्ञतेचा नमस्कार केला. १९९२पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विविध सहा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. दर एक वर्षाआड या पुरस्काराचे वितरण होते. यावर्षी गंगापूररोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘संगीत’ या क्षेत्रात गायक, संगीततज्ज्ञ, रचनाकार पंडित सत्यशील देशपांडे, ‘लोकसेवा’ क्षेत्रात मेळघाट येथे आदिवासी जमातीत राहून सेवा बजावणारे दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, ‘चित्रपट आणि नाट्य’ क्षेत्रात मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अमोल पालेकर, ‘ज्ञान’ या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, ‘चित्र-शिल्प’ या क्षेत्रात आंतरराष्टÑीय ख्यातीचे चित्रकार सुभाष अवचट आणि ‘साहस’ या प्रकारात मुंबईत नुकत्याच घडलेल्या कमला मिल आगीच्या दुर्घटनेत सुमारे २०० लोकांचा जीव वाचविणारे पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित करण्यात आले. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी, मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले, कुसुमाग्रज हे महाकवी, महामानव होते. माणूस म्हणून समाजाकडे व्यापक दृष्टीने पाहणारा हा कवी होता. कुसुमाग्रजांनी आयुष्यभर जीवनावर प्रेम केले. गोदावरी गौरव पुरस्कार हा कुसुमाग्रजांचा दैवी प्रसाद असल्याचेही कर्णिक यांनी सांगितले.आदिवासी संस्कृतीत स्त्रीचा सन्मानडॉ. स्मिता कोल्हे यांनी आदिवासी संस्कृतीत स्त्रियांना मिळणारा सन्मान आणि त्यांच्या मनांची श्रीमंती यावर प्रकाश टाकला. कोल्हे म्हणाल्या, शहरी भागात बेटी बचाव आंदोलने करावी लागतात. परंतु, आदिवासी भागात स्त्रीभ्रूण हत्या होतच नाहीत. आदिवासी संस्कृती ही स्त्रीप्रधान आहे. मुलीच्या जन्माचा तेथे उत्सव केला जातो. आम्हाला तेथे अनाथालय, वृद्धाश्रम काढायचे होते परंतु, तेथे अनाथ मुलेही नाहीत आणि माता-पित्यांचा सांभाळ करणारी मुले असल्याने वृद्धाश्रमाची गरज नाही, असे सांगत कोल्हे यांनी कुपोषित बालके तेथील कुटुंबाचा आधार कसा बनतात, याची हृदयस्पर्शी कथाच ऐकविली.पोलिसांबाबत नकारात्मकता सोडासुदर्शन शिंदे यांनी मुंबई पोलिसाचा आपण एक भाग असल्याबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. पोलीस हे सर्व स्तरावर आपली भूमिका निभावत असतात. काही लोकांमुळे पोलिसांबाबत असलेली नकारात्मकता सोडा. त्यांच्या पाठीवर वेळेत शाबासकी मिळाली तर ते खूप काही करू शकतील. परंतु, त्यांचे खच्चीकरण होत असल्याबद्दल शिंदे यांनी खंतही व्यक्त केली. आपण मनात आणले तर एखाद्या समाजसेवकापेक्षाही खूप मोठे काम करू शकतो, असेही शिंदे यांनी सांगितले.जुन्या-नव्यांची सांगडडॉ. स्नेहलता देशमुख म्हणाल्या, नव्या-जुन्यांची सांगड कशी घालावी, हे कुसुमाग्रजांकडूनच शिकले पाहिजे. माणुसकीचा आधार घेऊन शिकविणारे शिक्षण असले पाहिजे. मुंबई विद्यापीठात कुलगुरूपदी कार्यरत असताना दाखल्यावर वडिलांसोबत आईचेही नाव समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि तो नंतर सर्व विद्यापीठांनी स्वीकारला. यावेळी डॉ. देशमुख यांनी तात्यासाहेबांच्या काही काव्यपंक्ती सादर करत मिळालेला पुरस्कार आपल्या आईला समर्पित केला.तात्यासाहेब माझ्यापाशी नाहीतचित्रकार सुभाष अवचट यांनीही तात्यासाहेबांसमवेतच्या आठवणींना उजाळा दिला. तात्यासाहेब हे शब्दमहर्षि होते. त्यांची व माझी परिभाषा वेगळी असली तरी मैत्रीचा एक पक्का धागा सोबत होता. साधना परिवार या अजब विद्यापीठातूनही मला खूप काही शिकायला मिळाले. एस. एम. जोशी, प्रधान मास्तर, बाबा आमटे यांच्या सहवासात मी वाढलो. त्यांनी एक दृष्टी दिली. माझ्या प्रत्येक प्रदर्शनापूर्वी तात्यासाहेब शुभेच्छापत्र पाठवित असत. तो मला मोठा आधार वाटायचा. आज तात्यासाहेब माझ्यापाशी नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.कुसुमाग्रजांची काव्यसंपदा जवळचीपंडित सत्यशील देशपांडे यांनी सांगितले, कुसुमाग्रज हे महाकवी होते. त्यांची काव्यसंपदा मला जवळची वाटायची. कुसुमाग्रजांची कविता गाऊनच माझे टीव्हीवर पदार्पण झाले होते. माफक काव्य ही बंदिशीची गरज आहे. संगीत विचार पुढच्या पिढीपर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठी हा पुरस्कार मला निश्चितच प्रेरणा देईल, अशी भावनाही देशपांडे यांनी व्यक्त केली.व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे बळज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी सांगितले, कुुसुमाग्रज आणि वि. वा. शिरवाडकर या दोन्ही उत्तुंग व्यक्तींनी मलाच नव्हे तर माझ्या संपूर्ण पिढीला भरभरून दिले आहे. त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. संवेदना विकसित केल्या. सांस्कृतिक वारसा दिला. सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना उत्तम साहित्य सहजगत्या उपलब्ध होत होते. त्यातून आमची साहित्य व सौंदर्यविषयक जाण विकसित होत गेली. मी जेव्हा जेव्हा व्यवस्थेविरुद्ध लढा देतो त्यावेळी तात्यासाहेबांच्या शब्दांतूनच लढण्याचे बळ मिळते. ‘फक्त लढ म्हणा’ या तीन शब्दांतून आशीर्वाद प्राप्त होतो, असे सांगत पालेकर यांनी गोदावरी गौरव हा पुरस्कार आशीर्वादच असल्याचे सांगितले.