शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

गोदावरीला पूरसदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:50 IST

गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली.

नाशिक : गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२८) पावसाने शहरात उघडीप दिली. त्यामुळे शहरात कमी पाऊस पडला असला तरी गंगापूरचे पाणलोट क्षेत्र ओळखल्या जाणाºया त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र जोरदार पाऊस झाला. तसेच गंगापूर धरण समूहाच्या परिसरात सोमवारी १२ तासांत ९० मि.मी. पाऊस झाला. रविवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण दुप्पट झाले. त्यामुळे दिवसभर गंगापूरमधून विसर्ग सुरूच होता. सातत्याने विसर्गामध्ये वाढ होत गेली. संध्याकाळी ५ वाजता दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती; मात्र रात्री दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले होते. कारण रात्री ८ वाजता सात हजार १०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू करण्यात आला होता. यामुळे गोदावरीला संध्याकाळपासूनच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे काठावरील विक्रेत्यांसह पूजाविधीसाठी आलेल्या भाविकांची धावपळ झाली. कपालेश्वरजवळील पाणपोईपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती. यामुळे गोदावरी प्राचीन मंदिरासह, गंगा-गोदावरी मंदिर निम्म्याहून अधिक बुडाले होते. तसेच निलकंठेश्वर मंदिराच्या नंदीपर्यंत पाणी पोहचले होते. तसेच देवमामलेदार मंदिराचे प्रवेशद्वारही पाण्याखाली गेले होते. एकूणच रात्री पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने अग्निशामक दलाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात होता. गोदाकाठावरील वस्त्रांतरगृहा-पासून दुतोंड्यापर्यंत आणि रामसेतू पूल या ठिकाणांच्या विक्रेत्यांनी दुपारी ४ वाजेपासूनच व्यवसाय आवरण्यास सुरुवात केली. अग्निशामक दल्याच्या जवानांनी गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याची सूचना दिल्यानंतर सर्वच विक्रेते सावध झाले. यावेळी विक्रेत्यांनी विक्रीस आणलेला माल, टपºया, पाणकापड असे साहित्य आटोपून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तसेच तपोवनातील कपिला संगम येथील फळविक्रेत्यांनी दुपारी ३ वाजेपासनूच परिसर रिकामा करत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते.गंगापूर धरण ९४ टक्केगंगापूर धरण समूहात सोमवारी पावसाचे प्रमाण दुपटीने वाढले होते. आठ तासांत ९० मि.मी. पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने सातत्याने विसर्ग वाढविला जात होता. गंगापूर धरणात ५ हजार २७१ दलघफू इतका पाणीसाठा असून, धरण ९४ टक्के भरले आहे. तसेच समूहातील काश्यपी, गौतमी-गोदावरी हे मध्यम स्वरूपाचे धरणे ९९ टक्के भरली आहेत. तसेच आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. एकूणच या चारही धरणे मिळून समूहात ९ हजार ९३२ दलघफू (९६टक्के) इतका पाणीसाठा आहे.