शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोदावरीला पूरसदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:50 IST

गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली.

नाशिक : गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२८) पावसाने शहरात उघडीप दिली. त्यामुळे शहरात कमी पाऊस पडला असला तरी गंगापूरचे पाणलोट क्षेत्र ओळखल्या जाणाºया त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र जोरदार पाऊस झाला. तसेच गंगापूर धरण समूहाच्या परिसरात सोमवारी १२ तासांत ९० मि.मी. पाऊस झाला. रविवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण दुप्पट झाले. त्यामुळे दिवसभर गंगापूरमधून विसर्ग सुरूच होता. सातत्याने विसर्गामध्ये वाढ होत गेली. संध्याकाळी ५ वाजता दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती; मात्र रात्री दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले होते. कारण रात्री ८ वाजता सात हजार १०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू करण्यात आला होता. यामुळे गोदावरीला संध्याकाळपासूनच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे काठावरील विक्रेत्यांसह पूजाविधीसाठी आलेल्या भाविकांची धावपळ झाली. कपालेश्वरजवळील पाणपोईपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती. यामुळे गोदावरी प्राचीन मंदिरासह, गंगा-गोदावरी मंदिर निम्म्याहून अधिक बुडाले होते. तसेच निलकंठेश्वर मंदिराच्या नंदीपर्यंत पाणी पोहचले होते. तसेच देवमामलेदार मंदिराचे प्रवेशद्वारही पाण्याखाली गेले होते. एकूणच रात्री पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने अग्निशामक दलाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात होता. गोदाकाठावरील वस्त्रांतरगृहा-पासून दुतोंड्यापर्यंत आणि रामसेतू पूल या ठिकाणांच्या विक्रेत्यांनी दुपारी ४ वाजेपासूनच व्यवसाय आवरण्यास सुरुवात केली. अग्निशामक दल्याच्या जवानांनी गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याची सूचना दिल्यानंतर सर्वच विक्रेते सावध झाले. यावेळी विक्रेत्यांनी विक्रीस आणलेला माल, टपºया, पाणकापड असे साहित्य आटोपून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तसेच तपोवनातील कपिला संगम येथील फळविक्रेत्यांनी दुपारी ३ वाजेपासनूच परिसर रिकामा करत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते.गंगापूर धरण ९४ टक्केगंगापूर धरण समूहात सोमवारी पावसाचे प्रमाण दुपटीने वाढले होते. आठ तासांत ९० मि.मी. पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने सातत्याने विसर्ग वाढविला जात होता. गंगापूर धरणात ५ हजार २७१ दलघफू इतका पाणीसाठा असून, धरण ९४ टक्के भरले आहे. तसेच समूहातील काश्यपी, गौतमी-गोदावरी हे मध्यम स्वरूपाचे धरणे ९९ टक्के भरली आहेत. तसेच आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. एकूणच या चारही धरणे मिळून समूहात ९ हजार ९३२ दलघफू (९६टक्के) इतका पाणीसाठा आहे.