शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीला पूरसदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:50 IST

गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली.

नाशिक : गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२८) पावसाने शहरात उघडीप दिली. त्यामुळे शहरात कमी पाऊस पडला असला तरी गंगापूरचे पाणलोट क्षेत्र ओळखल्या जाणाºया त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र जोरदार पाऊस झाला. तसेच गंगापूर धरण समूहाच्या परिसरात सोमवारी १२ तासांत ९० मि.मी. पाऊस झाला. रविवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण दुप्पट झाले. त्यामुळे दिवसभर गंगापूरमधून विसर्ग सुरूच होता. सातत्याने विसर्गामध्ये वाढ होत गेली. संध्याकाळी ५ वाजता दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती; मात्र रात्री दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले होते. कारण रात्री ८ वाजता सात हजार १०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू करण्यात आला होता. यामुळे गोदावरीला संध्याकाळपासूनच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे काठावरील विक्रेत्यांसह पूजाविधीसाठी आलेल्या भाविकांची धावपळ झाली. कपालेश्वरजवळील पाणपोईपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती. यामुळे गोदावरी प्राचीन मंदिरासह, गंगा-गोदावरी मंदिर निम्म्याहून अधिक बुडाले होते. तसेच निलकंठेश्वर मंदिराच्या नंदीपर्यंत पाणी पोहचले होते. तसेच देवमामलेदार मंदिराचे प्रवेशद्वारही पाण्याखाली गेले होते. एकूणच रात्री पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने अग्निशामक दलाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात होता. गोदाकाठावरील वस्त्रांतरगृहा-पासून दुतोंड्यापर्यंत आणि रामसेतू पूल या ठिकाणांच्या विक्रेत्यांनी दुपारी ४ वाजेपासूनच व्यवसाय आवरण्यास सुरुवात केली. अग्निशामक दल्याच्या जवानांनी गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याची सूचना दिल्यानंतर सर्वच विक्रेते सावध झाले. यावेळी विक्रेत्यांनी विक्रीस आणलेला माल, टपºया, पाणकापड असे साहित्य आटोपून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तसेच तपोवनातील कपिला संगम येथील फळविक्रेत्यांनी दुपारी ३ वाजेपासनूच परिसर रिकामा करत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते.गंगापूर धरण ९४ टक्केगंगापूर धरण समूहात सोमवारी पावसाचे प्रमाण दुपटीने वाढले होते. आठ तासांत ९० मि.मी. पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने सातत्याने विसर्ग वाढविला जात होता. गंगापूर धरणात ५ हजार २७१ दलघफू इतका पाणीसाठा असून, धरण ९४ टक्के भरले आहे. तसेच समूहातील काश्यपी, गौतमी-गोदावरी हे मध्यम स्वरूपाचे धरणे ९९ टक्के भरली आहेत. तसेच आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. एकूणच या चारही धरणे मिळून समूहात ९ हजार ९३२ दलघफू (९६टक्के) इतका पाणीसाठा आहे.