शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

गोदावरी धोक्याच्या पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:35 IST

नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. काठावरील व्यावसायिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून, नदीवरील पुलांवरून पुराचे पाणी वाहत आहे. सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकच्या पुराचे परिमाण असणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे.  नाशिक शहर परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी गंगापूर धरण  क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे. यामुळे सायंकाळी चार वाजेनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. धरणातून सकाळपासून विसर्ग सुरू होता. सकाळी आठ वाजेपासून धरणातून साडेदहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. सायंकाळी चार वाजेनंतर दोन टप्प्यात एकूण चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. नदीपात्रावरील गाडगे महाराज, होळकर आणि लक्ष्मीनारायण हे पूल वगळता अन्य पूल पाण्याखाली गेले आहेत. होळकर पुलाच्या अगदी २५ फुटांवर पुराचे पाणी येऊन ठेपले आहे. कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले असून, पुराचे परिमाण मोजणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. काठावरील दुकानदारांनी टपऱ्या हलविल्या असून, दुकानदारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कळवण तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतपिकांचे व शेतीच्या बांधाचे नुकसान झाले. गिरणा ,पुनंद बेहडी,म्हशाड ,मार्कंडेश्वर आदी नद्या व नाल्यांना पूर आला असून गिरणा व पुनंद नदीकाठच्या नागरिकांना व गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात रविवारी ४१ मिमि पाऊस पडला असून ५० टक्के पाणीसाठा असून चणकापूर प्रकल्पातून ४७८५ क्यूसेसने गिरणा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आले आहे. प्रकल्पात आज १५८० दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे, तर अर्जुनसागर (पुनंद)प्रकल्प ५२ टक्के भरले असून प्रकल्पातून पुनंद नदीपात्रात ५०२५ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा व पुनंदसाठा नदीला पूर आला आहे.  दिंडोरी शहरासह तालुक्यात रविवारी संततधार पावसाने हजेरी लावल्याने विविध नदी नाल्यांना पूर आले होते तर सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून पालखेड धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने धरणातून डावा कालवा व कादवा नदीत पाणी सोडण्यात आले आहे .पेठ तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून लहान मोठया सर्वच नद्यांना मोठया प्रमाणावर पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पेठ -जोगमोडी, पेठ -भूवन, करंजाळी -कोहोर, भायगाव -डोल्हारमाळ, मुरूमट्टी , आडगाव, उम्रद, बोंडारमाळ परिसरातील फरशी पुलावरून पुर पाण्याचा विसर्ग होत असल्याने गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून विसर्गपावसामुळे दारणा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरीसह नदीकाठच्या भागात पाणी घुसले असून, शेती, वीटभट्टी यांसह बाजारतळात पाणी घुसले आहे. तीन दिवसांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. नांदूरमधमेशवर धरणाचे आठही गेट खुले केल्याने ६१ हजार १३८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सायखेडा आणि चांदोरी गावातील नदीलगतच्या वस्तीत पाणी शिरले आहे. सायखेड्यातील बाजारतळात पाणी गेल्याने या भागातील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील सर्व धरणे निम्म्याहून अधिक भरली आहेत. गंगापूर धरणाचा जलसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे काही धरणांमधील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.