शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

मतदानाचा टक्का वाढविणे हेच उद्दिष्ट : आनंदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:28 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारयादी अधिकाधिक पारदर्शक आणि दोषविरहित असावी, यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू केलेल्या मोहिमेत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील या कामात जनतेचाही सहभाग वाढला आहे. निवडणुकीच्या या कामाविषयी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्याशी साधलेला संवाद...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारयादी अधिकाधिक पारदर्शक आणि दोषविरहित असावी, यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू केलेल्या मोहिमेत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील या कामात जनतेचाही सहभाग वाढला आहे. निवडणुकीच्या या कामाविषयी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्याशी साधलेला संवाद...नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९साठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि मतदारयाद्या दोषविरहित करण्याची प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुरू आहे. गेल्या महिनाभराच्या या मोहिमेत मतदानाविषयी प्रचंड जागरूकता निर्माण झाली असून, लोकसहभागही वाढला आहे. दररोज जिल्ह्यात मतदानाविषयीच्या होणाऱ्या मोहिमेतून मतदारही दक्ष झाला आहे. सदर मोहीम ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.प्रश्न : मतदार जनजागृतीसाठी सुरू केलेल्या निवडणूक शाखेच्या मोहिमेविषयी काय सांगाल?आनंदकर : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मतदानाची टक्केवारी पाहता जिल्हा प्रशासनाने मतदार यादीच्या शुद्धीकरणाची मोहीम लगेचच हाती घेतली. यामध्ये प्रामुख्याने यादीतील मयत आणि दुबार नावे वगळणे, दुरुस्ती करणे, चुका दुरुस्त करणे, यादीसंदर्भात असलेल्या तक्रारींचा निपटारा करणे आणि यादी अधिकाधिक दोषविरहित आणि परिपूर्ण करण्याकडे भर देण्यात आला. १ जानेवारी २०१९ च्या अर्हता दिनांकावर पात्र असलेल्या सर्व मतदारांची मतदार म्हणून मतदार यादीत नोंद करणे आणि विधानसभेत मतदानाची टक्केवारी कशी वाढू शकेल, यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही मोहीम फलद्रूप होताना दिसते.प्रश्न : मोहिमेत मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद कसा आहे?आनंदकर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मागील ५२ वर्षांतील सर्वाधिक मतदान टक्केवारीची नोंद झाली, परंतु यावरही जिल्हा निवडणूक प्रशासन समाधानी नाही. मतदानाची टक्केवारी आणखी वाढविण्यासाठी निवडणूक शाखेने अनेक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमात सर्व प्रशासकीय यंत्रणा व जिल्ह्यातील नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.प्रश्न : मतदारयादी शुद्धीकरणात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकची कामगिरी कशी आहे?आनंदकर : राज्यातील ३६ जिल्ह्यांचा विचार करता नाशिक जिल्हा हा निश्चितच अग्रेसर आहे. नाशिक जिल्हा हा निवडणूक कामाच्या व्यापकतेच्या दृष्टीने राज्यातील चौथ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. महानगरीय किंवा नागरी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा क्रमांक वरचा आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मतदारयादी व एकंदर निवडणूक संचलनामध्ये नाशिक जिल्हा वरच्या क्रमांकावर आहे.प्रश्न : या मोहिमेचे निवडणूक शाखेने कसे नियोजन केले आहे?आनंदकर : जिल्हा निवडणूक शाखेने जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासह नायब तहसीलदार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामध्ये या मोहिमेविषयी जागृती करण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना कामाचे प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आलेले आहे. निवडणूक कामाची आवड असणारे नागरिक आणि विद्यार्थीही या कामात जोडले जात आहेत.प्रश्न : या मोहिमेत मतदारयाद्या किती प्रमाणात पारदर्शक होऊ शकतील, असे वाटते?आनंदकर : नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या आजमितीस जवळपास ६५ लाख एवढी असून, मतदारांची संख्या ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. लोकसंख्या व मतदारांचा विचार करता नाशिक जिल्हा जगातील १००पेक्षा जास्त देशांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या जिल्ह्यात मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे खरोखरीच मोठे आव्हान आहे. तरीसुद्धा जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे मतदारयादी अधिकाधिक परिपूर्ण होत आहे.प्रश्नावलीचा उपक्रमजिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सात लाख विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांमार्फत एक प्रश्नावली मतदारांपर्यंत पोहोचविली जात आहे. मतदान विषयक जागरूकता निर्माण करणाºया या प्रश्नाने यादी शुद्धीकरणाला अधिक चालना मिळतेय.निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात निवडणूक कर्मचाºयांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू आहे. या मोहिमेत मतदान कर्मचाºयांना प्रोत्साहन देण्याची संकल्पना या मोहिमेला बळ देणारी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर चांगले मतदान झाले त्या कर्मचाºयांना गौरविण्यात आले. विधानसभेसाठीही कर्मचाºयांना प्रोत्साहित केले जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानvidhan sabhaविधानसभा