शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शंभर दिवसांत १४७ कार्यक्रमांचे लक्ष्य

By admin | Updated: August 30, 2016 02:11 IST

विजया रहाटकर : राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यशाळेत निर्णय

नाशिक : राज्य महिला आयोगातर्फे शंभर दिवसांत १४७ कार्यक्रम घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, राज्यात महिल्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सुजाण समाज निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन केले असल्याचे प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले. आयएमए सभागृहात राज्य महिला आयोेग विभागीय कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे, गयाताई कराड, अ. ना. त्रिपाठी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण अंकुश शिंदे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. शोभा शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधिक माहिती देताना रहाटकर यांनी सांगितले की, मिशन १४७ अंतर्गत कार्यशाळा, जनजागृतीपर कार्यक्रम यांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या कायद्याबरोबरच मनापासून, कृतीतून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी महिलांसाठी काम करणाऱ्या सर्व समुपदेशकांना भर देण्यात येणार आहे. महिला आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात येणे अडचणीचे ठरत असल्याचे जाणवल्याने आयोगच महाराष्ट्र दौऱ्यावर निघाला असून, त्याअंतर्गत आजपर्यंत औरंगाबाद, नांदेड, कोकण, कोल्हापूर, नाशिक येथे दौरे झाले आहेत. केवळ मुंबईचाच दौरा आता शिल्लक असून, महिला आयोगाकडील जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. शोभा शिंदे, अ‍ॅड. मीनल कोहर, सोलापूर येथील प्रयास संस्थेच्या देवयानी टुम्मा आदिंनी ‘लिंग समभाव व संवेदनशीलता’, ‘महिला विषयक कायदे’, ‘कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा’ या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. गटचर्चेने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)