शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गळून पडलेले टमाटे तहसीलदारांना भेट

By admin | Updated: September 2, 2016 22:51 IST

गळून पडलेले टमाटे तहसीलदारांना भेट

सटाणा : तालुक्यातील चौगाव परिसरातील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या टमाटा वाणाची लागवड करून गळून पडलेली कच्ची-पक्की फळे थेट ट्रॉली भरून तहसील कार्यालयात आणून टाकत गांधीगिरी केली. तहसीलदारांना टमाटे दाखवित संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.लाखो रु पये खर्च करून हातातोंडाशी आलेले पीक केवळ बोगस वाणाच्या बियाणांमुळे वाया गेल्याने शेतकरी आक्र मक झाले. सदर कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.बियाणे लावून रोपे तयार करण्यापासून तर विविध औषधे व खते तसेच टमाटा झाड बांधणीसाठी असा लाखो रु पयांचा शेतक ऱ्यांनी खर्च करून बाग फुलवली. मात्र दोन ते अडीच महिन्यातच टमाटा फळांची अचानक गळती सुरू झाली असून, अनेक बागांमधील झाडांवरील सर्व फळे गळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आज गळती झालेला टमाटा थेट तहसील कार्यालयात आणून संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनावर काका रौंदळ, काशीनाथ मांडवडे, दीपक गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, संजय शेवाळे, कृष्णा शेवाळे, नारायण शेवाळे, रामदास शेवाळे, दीपक शेवाळे, नितीन शेवाळे, नानाजी शेवाळे, मोठाभाऊ शेवाळे, केदा शेवाळे, लोटन शेवाळे, केवळ गांगुर्डे, राकेश मांडवडे, कैलास गांगुर्डे आदिंसह शेकडो टमाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी व कृषिमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.