शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

रस्त्यांच्या बदल्यात ५१ एकर जमीन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:49 IST

नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागेविषयी निर्माण झालेल्या वादातून तोडगा निघत नाही तोच लष्कर म्हणजेच नाशिकमधील आर्टिलरी सेंटरने त्यांच्या परिसरात नागरी वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे बाधित क्षेत्राच्या बदल्यात तब्बल ५१ एकर जागा भरपाई म्हणून महापालिकेकडे मागितली असून, त्यामुळे महापालिका प्रशासन चकित झाले आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत अशाप्रकारची मागणी करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीदेखील जमिनीच्या बदल्यात भरपाई म्हणून जमीन देण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

ठळक मुद्देआर्टिलरीची अजब मागणी : महापालिकेचा नकार रस्त्यांच्या बदल्यात ५१ एकर जमीन द्या

नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागेविषयी निर्माण झालेल्या वादातून तोडगा निघत नाही तोच लष्कर म्हणजेच नाशिकमधील आर्टिलरी सेंटरने त्यांच्या परिसरात नागरी वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे बाधित क्षेत्राच्या बदल्यात तब्बल ५१ एकर जागा भरपाई म्हणून महापालिकेकडे मागितली असून, त्यामुळे महापालिका प्रशासन चकित झाले आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत अशाप्रकारची मागणी करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीदेखील जमिनीच्या बदल्यात भरपाई म्हणून जमीन देण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या दालनात बुधवारी (दि.६) लष्कर विभागाच्या विविध मागण्यांसाठी बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात लष्कराच्या स्थानिक अधिकाºयांबरोबरच राज्यातील अन्य महापालिकांचे अधिकारीदेखील उपस्थित होते. नाशिक महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रमेश पवार उपस्थित होते. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या वतीने ही मागणी करण्यात आली, अर्थात नाशिकबरोबर पुणे तसेच अहमदनगर या महापालिकांच्या क्षेत्रातील जागांबाबतदेखील असाच तिढा निर्माण झाल्याने आता राज्य सरकारच्या वतीने तोडगा काढला जाणार आहे.नाशिक शहराच्या परिसरातच आर्टिलरीची हद्द असून याच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. परिणामी महापालिकेला आपल्या करदात्यांना वेगवेगळ्या सेवा द्याव्या लागतात. याच कारणास्तव महापालिकेने रस्ते तयार केले असून त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लष्कराच्या परिसरात महापालिकेने अनेक रस्ते विकसित केले असून, जागा लष्कराची असली तरी त्यावरील रस्त्यांचा खर्च महापालिकेने केला आहे. तथापि, रस्त्यासाठी लष्कराची जागा महापालिकेने वापरल्याने जमिनीच्या बदल्यात जमीन म्हणून ५१ एकर जमीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परंतु मुळात महापालिकेने तयार केलेल्या रस्त्याचा वापर हा केवळ नागरिकच करीत नाहीत तर लष्करदेखील करते. त्यांची वाहनेदेखील याच मार्गाने ये-जा करीत असतात. त्यामुळे हे रस्ते केवळ सिव्हिलयन्ससाठी बांधले असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत पवार यांनी त्यास नकार दिला. राज्य सरकार लवकरच धोरण ठरविणारराज्यात अनेक महापालिका क्षेत्रात याच स्वरूपाचा प्रश्न असून, लष्कराने बाधित जमिनीच्या बदल्यात जमीन मागितल्याने संबंधित महापालिका अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे अशावेळी लष्कराच्या मागणीनुसार भरपाई म्हणून जमीन द्यायची की मोबदला याबाबत शासन निर्णय घेणार आहे. अर्थात, भरपाई देण्याचा निर्णय झाला तरी महापालिकेच्या दृष्टीने आर्थिक अडचणीचा ठरणार आहे. राज्य शासन महापालिका आणि लष्कर या दोन्ही यंत्रणांना रूचेल अशाप्रकारचा तोडगा काढण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय बाधित जमिनीच्या बदल्यात जमीन देऊन भरपाई करण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यात नसल्याने महापालिकेने लष्कराची मागणी तत्काळ फेटाळली. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारे लष्करी अधिकाºयांचे समाधान न झाल्याने अखेरीस राज्य शासन त्यावर तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात आले.