शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

घोटी - कसाऱ्यादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:36 IST

नाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते.

ठळक मुद्देरस्त्यांची दुरवस्था : टोल वसुली मात्र कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते.मुंबई - आग्रा महामार्गावर टोल वसूल करूनही ज्या पद्धतीने घोटी ते कसाºयाच्या दरम्यान खड्डे पडले आहेत, ते बघता दुरुस्ती-देखभाल न केल्याने टोल वसुली बंदच करायला हवी; मात्र तसे होत नसल्याने किमान रस्ते दुरुस्त करण्याची गरज असताना त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. हा सरळ सरळ नियमभंग असतानादेखील महामार्ग प्राधिकरण मूग गिळून बसले आहे.महामार्गाचे चौपदरीकरण किंवा सहापदरीकरण खासगीकरणातून करून त्या बदल्यात संंबंधित ठेकेदार कंपनीकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे शासनाला रस्त्यासाठी किंवा टोल कालवधीपर्यंत देखभाल-दुरुस्तीचा खर्च करावा लागत नाही, असा नियम आहे.परंतु त्याला कंपनीने हात लावलेला नाही आणि टोल वसुली मात्र सुरू आहे. त्यामुळे एक तर रस्ते सुधारावेत किंवा टोल बंद करावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात हे धोरण कागदावरच आहे, ज्या कंपन्या रस्ते तयार करून टोल वसूल करतात, त्याच कंपन्या नंतर रस्त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्षकरतात. मुंबई - आग्रामहामार्गाचे चौपदरीकरण झाले खरे, मात्र अनेक ठिकाणी रस्त्याचीदुरवस्था झाल्यानंतर टोल वसूल करणारी कंपनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते.कंपनी मात्र लक्ष पुरवण्यास तयार नाहीदरवर्षीप्रमाणे यंदाही घोटी, इगतपुरी आणि पुढे कसाºयापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या रेल्वे पुरेशा संख्येने सुरू नसल्याने खासगी वाहनातूनच प्रवास मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळेच या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे; परंतु कंपनी मात्र कोणत्याही प्रकारे लक्ष पुरवण्यास तयार नाही. ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये रस्त्याची दुरवस्था दिसून आली.यापूर्वीही इगतपुरी-कसारादरम्यानचा रस्ता खचला आहे; परंतु त्याचे कामदेखील अद्याप पूर्ण नसून मलमपट्टी करून वाहतूक सुरू आहे. हा रस्ता खचला तेव्हा काही दिवस टोल बंद ठेवण्यात आला होता. आता टोल वसुली सुरू आहे. रस्त्याची कायमस्वरूपाची दुरुस्ती कधी होणार याबाबत कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण मौन बाळगून आहे. आता खड्डे पडल्यानंतर तत्काळ दुरुस्ती अपेक्षित आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग