शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घोटी - कसाऱ्यादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:36 IST

नाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते.

ठळक मुद्देरस्त्यांची दुरवस्था : टोल वसुली मात्र कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते.मुंबई - आग्रा महामार्गावर टोल वसूल करूनही ज्या पद्धतीने घोटी ते कसाºयाच्या दरम्यान खड्डे पडले आहेत, ते बघता दुरुस्ती-देखभाल न केल्याने टोल वसुली बंदच करायला हवी; मात्र तसे होत नसल्याने किमान रस्ते दुरुस्त करण्याची गरज असताना त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. हा सरळ सरळ नियमभंग असतानादेखील महामार्ग प्राधिकरण मूग गिळून बसले आहे.महामार्गाचे चौपदरीकरण किंवा सहापदरीकरण खासगीकरणातून करून त्या बदल्यात संंबंधित ठेकेदार कंपनीकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे शासनाला रस्त्यासाठी किंवा टोल कालवधीपर्यंत देखभाल-दुरुस्तीचा खर्च करावा लागत नाही, असा नियम आहे.परंतु त्याला कंपनीने हात लावलेला नाही आणि टोल वसुली मात्र सुरू आहे. त्यामुळे एक तर रस्ते सुधारावेत किंवा टोल बंद करावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात हे धोरण कागदावरच आहे, ज्या कंपन्या रस्ते तयार करून टोल वसूल करतात, त्याच कंपन्या नंतर रस्त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्षकरतात. मुंबई - आग्रामहामार्गाचे चौपदरीकरण झाले खरे, मात्र अनेक ठिकाणी रस्त्याचीदुरवस्था झाल्यानंतर टोल वसूल करणारी कंपनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते.कंपनी मात्र लक्ष पुरवण्यास तयार नाहीदरवर्षीप्रमाणे यंदाही घोटी, इगतपुरी आणि पुढे कसाºयापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या रेल्वे पुरेशा संख्येने सुरू नसल्याने खासगी वाहनातूनच प्रवास मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळेच या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे; परंतु कंपनी मात्र कोणत्याही प्रकारे लक्ष पुरवण्यास तयार नाही. ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये रस्त्याची दुरवस्था दिसून आली.यापूर्वीही इगतपुरी-कसारादरम्यानचा रस्ता खचला आहे; परंतु त्याचे कामदेखील अद्याप पूर्ण नसून मलमपट्टी करून वाहतूक सुरू आहे. हा रस्ता खचला तेव्हा काही दिवस टोल बंद ठेवण्यात आला होता. आता टोल वसुली सुरू आहे. रस्त्याची कायमस्वरूपाची दुरुस्ती कधी होणार याबाबत कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण मौन बाळगून आहे. आता खड्डे पडल्यानंतर तत्काळ दुरुस्ती अपेक्षित आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग