शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

घोटी : नियोजन नसल्याने दर उन्हाळ्यात टंचाई

By admin | Updated: March 20, 2015 23:49 IST

धरणांच्या तालुक्यात पाण्याचा वनवास

घोटी : इगतपुरी तालुका सर्वाधिक धरणाचा तालुका. सहा मोठ्या क्षमतेची व अनेक लहान-मोठे बांध-बंधाऱ्यांसह शेततळेही आहेत. सर्वाधिक पाऊस तालुक्यात होत असल्याने पावसाळ्यात भरून वाहतात. परंतु या पाण्याचे नियोजन नसल्याने दर उन्हाळ्यात जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान, सर्वात जुन्या दारणा, वैतरणा, कडवा यासह मुकणे धरणात गाळाचे प्रमाण वाढत असल्याने साठ्यात कमालीची घट होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दारणा धरणाच्या साठवण क्षमतेपेक्षा सुमारे दीड टीएमसी पाण्याची क्षमता कमी झाली असल्याचे समजते.पंधरा वर्षापासून रखडले कामतालुक्यात खापरी नदीवर वाकी खापरी व भाम नदीवर भाम या दोन धरणांची कामे रखडली आहेत. यातील वाकी खापरी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याने धरणाच्या कामाला विरोध दर्शविला आहे. धरणासाठी संपादित केलेल्या भावली, कोरपगाव, पिंपळगाव भटाटा, वाळविहीर, धार्नोली या गावांचे पुनर्वसनाचे कोणतेही काम गेली दहा वर्षांत करण्यात आले नाही. वाळविहीर येथील लोहारवाडीतील ग्रामस्थांनी स्वेच्छा पुनर्वसनाची तयारी दाखवूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी घोटी वैतरणा रस्त्यावर कोरपगावजवळ पुनर्वसनाची मॉडेल प्रतिकृती दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती.या ठिकाणी बांधण्यात आलेल्या इमारतीची वापराअभावी दुरवस्था झाली असताना शासन याच प्रतिकृतीच्या भरवशावर चारही गावांचे पुनर्वसन झाले असे जाहीर करते. दरम्यान, राज्य सरकारात फेरबदल झाल्याने धरणाच्या निधीसाठी मंजूर झालेला वाढीव निधी रखडल्याने वाकी खापरी धरणाला अजून दोन वर्ष पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विस्थापित गावाच्या संपादित जमिनीचा मोबदला मिळणे बाकी आहे. तसेच बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या रस्त्याला शिंदेवाडी ते वाळविहीर गावठा असा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला असून, पावसात अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. जोपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धरणाचे काम चालू होऊ देणार नाही, असा पवित्रा प्रकल्पग्रस्त घेत आहेत. अशीच अवस्था भाम धरणाची असून, भाम धरण्ग्रस्तांचे ही अद्याप कोणतेही पुनर्वसन झालेले नाही. (वार्ताहर)