शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मनावरचा गंज साधनेद्वारे करा दूर

By admin | Updated: August 1, 2015 00:37 IST

श्रीएम : गुरुपौर्णिमा सत्संगात अनुयायांना मार्गदर्शन

नाशिक : गुरू हे आपल्याविषयी आपल्यापेक्षा अधिक जाणत असतात. ते लोहचुंबकासारखे असतात. शिष्य लोखंडाप्रमाणे गुरुकडे आपोआप आकर्षिले जातात; मात्र त्यासाठी आधी मनावरचा गंज काढावा लागतो. हा गंज साधनेद्वारेच दूर होऊ शकतो, असा संदेश आध्यात्मिक गुरू श्रीएम यांनी दिला. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सत्संगात श्रीएम यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. दादासाहेब गायकवाड सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी श्रीएम म्हणाले, गुरू स्वत:चा नव्हे, तर कायम शिष्यांचाच विचार करतात. गुरुकृपेसाठी भाविकांनी आधी मनावरचा गंज काढावा. अनेकांना ते तमोगुणात असूनही सत्त्वगुणात असल्यासारखे वाटत राहते. तमोगुणातून आधी रजोगुणात यावे लागते, मगच सत्त्वगुणाकडे जाता येते. म्हणून झोपून राहू नका, जागे व्हा. झोपेतली साधना उपयोगाची नाही. जागृतावस्थेतील समाधीच तुम्हाला खरा आत्मानुभव देऊ शकेल. मनुष्य वा पशूंच्या अधिकाधिक सेवेनेच मन शुद्ध होईल व तुमची वाटचाल सत्त्वगुणाकडे सुरू होईल. ‘सर्वांत मोठा योगी कोण?’ असे अर्जुनाने कृष्णाला गीतेत विचारले. त्यावर बाराव्या अध्यायात कृष्णाचे उत्तर होते- जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, कोणत्याही परिस्थितीत ज्याच्या मनाची अवस्था सारखीच असते, तोच खरा योगी असतो. आपली निंदा करणारी व्यक्ती आपल्यासाठी चांगली असते. कारण तिच्यामुळे आपल्याला चुकांची जाणीव होते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास खऱ्या आनंदाची प्राप्ती होईल. लोकांकडे सगळे काही असूनही ते फाटक्या फकिराकडे का धावतात? कारण त्याला आत्मानुभव प्राप्त झालेला असतो, तो परमेश्वराच्या अधिक जवळ गेलेला असतो. तुम्हीही त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा, असेही श्रीएम म्हणाले. दरम्यान, कार्यक्रमात प्रारंभी श्रीएम यांच्या ‘वॉक आॅफ होप’ या पदयात्रेविषयी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. सायंकाळीही त्यांनी विश्वास लॉन्स येथे भाविकांना संबोधित केले. (प्रतिनिधी)