शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

मनावरचा गंज साधनेद्वारे करा दूर

By admin | Updated: August 1, 2015 00:37 IST

श्रीएम : गुरुपौर्णिमा सत्संगात अनुयायांना मार्गदर्शन

नाशिक : गुरू हे आपल्याविषयी आपल्यापेक्षा अधिक जाणत असतात. ते लोहचुंबकासारखे असतात. शिष्य लोखंडाप्रमाणे गुरुकडे आपोआप आकर्षिले जातात; मात्र त्यासाठी आधी मनावरचा गंज काढावा लागतो. हा गंज साधनेद्वारेच दूर होऊ शकतो, असा संदेश आध्यात्मिक गुरू श्रीएम यांनी दिला. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सत्संगात श्रीएम यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. दादासाहेब गायकवाड सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी श्रीएम म्हणाले, गुरू स्वत:चा नव्हे, तर कायम शिष्यांचाच विचार करतात. गुरुकृपेसाठी भाविकांनी आधी मनावरचा गंज काढावा. अनेकांना ते तमोगुणात असूनही सत्त्वगुणात असल्यासारखे वाटत राहते. तमोगुणातून आधी रजोगुणात यावे लागते, मगच सत्त्वगुणाकडे जाता येते. म्हणून झोपून राहू नका, जागे व्हा. झोपेतली साधना उपयोगाची नाही. जागृतावस्थेतील समाधीच तुम्हाला खरा आत्मानुभव देऊ शकेल. मनुष्य वा पशूंच्या अधिकाधिक सेवेनेच मन शुद्ध होईल व तुमची वाटचाल सत्त्वगुणाकडे सुरू होईल. ‘सर्वांत मोठा योगी कोण?’ असे अर्जुनाने कृष्णाला गीतेत विचारले. त्यावर बाराव्या अध्यायात कृष्णाचे उत्तर होते- जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, कोणत्याही परिस्थितीत ज्याच्या मनाची अवस्था सारखीच असते, तोच खरा योगी असतो. आपली निंदा करणारी व्यक्ती आपल्यासाठी चांगली असते. कारण तिच्यामुळे आपल्याला चुकांची जाणीव होते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास खऱ्या आनंदाची प्राप्ती होईल. लोकांकडे सगळे काही असूनही ते फाटक्या फकिराकडे का धावतात? कारण त्याला आत्मानुभव प्राप्त झालेला असतो, तो परमेश्वराच्या अधिक जवळ गेलेला असतो. तुम्हीही त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा, असेही श्रीएम म्हणाले. दरम्यान, कार्यक्रमात प्रारंभी श्रीएम यांच्या ‘वॉक आॅफ होप’ या पदयात्रेविषयी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. सायंकाळीही त्यांनी विश्वास लॉन्स येथे भाविकांना संबोधित केले. (प्रतिनिधी)