शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

कालव्यातून विसर्ग करा!

By admin | Updated: August 20, 2016 00:19 IST

येवला : धरणातील उर्वरित पूरपाणी नदीमार्गे सोडण्याची मागणी

 येवला : नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्याला पूरपाणी नदीमार्गाने जात असल्याने ‘नाशिक जिल्हा उपाशी, तर मराठवाडा तुपाशी’ अशी संतप्त भावना जिल्ह्यातून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकरी व्यक्त करत असतानाच्या पार्श्वभूमीवर येवल्याचे अ‍ॅड. शाहूराजे माणिकराव शिंदे हे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आगामी आठ दिवसात हस्तक्षेप जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठ व मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. १९०५ साली करंजवण व नंतर पालखेड धरण बांधताना नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळत असलेल्या येवला तालुक्यासाठी पाणीवापर गृहीत धरण्यात आला होता. पर्जन्यछायेचा व दुष्काळी प्रदेश गृहीत धरून जिल्ह्यातील धरणे बांधली आहेत. या बाबीचा विचार मराठवाड्याच्या पाण्यासाठी भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत दुर्लक्षित झाला असल्याची भावना येवला तालुकावासीयांची आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाडा व नाशिक पाणीप्रश्नावरून वाद पेटत आहे. मराठवाड्याला पाणी देण्यासाठी विरोध नाही; मात्र नाशिककरांसह येवल्याची तहान अगोदर भागवा, मगच पूरपाण्याचा विसर्ग नदीमार्गे करा, अशी मागणी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून होत आहे. पाणी देण्यावरून सातत्याने संघर्ष होतो. दोन वर्षांपासून समन्यायी पाणीवाटपाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याला सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सिंचन धोक्यात आले आहे. आता न्यायालयाच्या आदेशाने मराठवाड्याला पूरपाणी दिले जात आहे; परंतु येवला तालुका मात्र उपेक्षितच राहत आहे. गेल्या वीस वर्षात प्रथमच आॅगस्ट महिन्यात करंजवण धरण भरले. त्यामुळे येवलेकरांच्या आशा वाढल्या. परंतु पूरपाण्याचा थेंबही अद्यापपावेतो येवल्याला मिळालेला नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असला तरी येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पीकपाणी आले मात्र विहिरी, बंधारे, पाझर तलाव अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पाण्याची उपलब्धता असली तरी आगामी दिवसांत येवला तालुक्याला पुन्हा दुष्काळाच्या सावटाखाली जाण्याची चिन्हे असतानादेखील पूरपाण्याचा थेंबदेखील येवल्याला मिळू नये ही शोकांतिका आहे. (वार्ताहर)