शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

कालव्यातून विसर्ग करा!

By admin | Updated: August 20, 2016 00:19 IST

येवला : धरणातील उर्वरित पूरपाणी नदीमार्गे सोडण्याची मागणी

 येवला : नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्याला पूरपाणी नदीमार्गाने जात असल्याने ‘नाशिक जिल्हा उपाशी, तर मराठवाडा तुपाशी’ अशी संतप्त भावना जिल्ह्यातून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकरी व्यक्त करत असतानाच्या पार्श्वभूमीवर येवल्याचे अ‍ॅड. शाहूराजे माणिकराव शिंदे हे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आगामी आठ दिवसात हस्तक्षेप जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठ व मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. १९०५ साली करंजवण व नंतर पालखेड धरण बांधताना नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळत असलेल्या येवला तालुक्यासाठी पाणीवापर गृहीत धरण्यात आला होता. पर्जन्यछायेचा व दुष्काळी प्रदेश गृहीत धरून जिल्ह्यातील धरणे बांधली आहेत. या बाबीचा विचार मराठवाड्याच्या पाण्यासाठी भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत दुर्लक्षित झाला असल्याची भावना येवला तालुकावासीयांची आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाडा व नाशिक पाणीप्रश्नावरून वाद पेटत आहे. मराठवाड्याला पाणी देण्यासाठी विरोध नाही; मात्र नाशिककरांसह येवल्याची तहान अगोदर भागवा, मगच पूरपाण्याचा विसर्ग नदीमार्गे करा, अशी मागणी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून होत आहे. पाणी देण्यावरून सातत्याने संघर्ष होतो. दोन वर्षांपासून समन्यायी पाणीवाटपाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याला सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सिंचन धोक्यात आले आहे. आता न्यायालयाच्या आदेशाने मराठवाड्याला पूरपाणी दिले जात आहे; परंतु येवला तालुका मात्र उपेक्षितच राहत आहे. गेल्या वीस वर्षात प्रथमच आॅगस्ट महिन्यात करंजवण धरण भरले. त्यामुळे येवलेकरांच्या आशा वाढल्या. परंतु पूरपाण्याचा थेंबही अद्यापपावेतो येवल्याला मिळालेला नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असला तरी येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पीकपाणी आले मात्र विहिरी, बंधारे, पाझर तलाव अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पाण्याची उपलब्धता असली तरी आगामी दिवसांत येवला तालुक्याला पुन्हा दुष्काळाच्या सावटाखाली जाण्याची चिन्हे असतानादेखील पूरपाण्याचा थेंबदेखील येवल्याला मिळू नये ही शोकांतिका आहे. (वार्ताहर)