शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

डाव्या कालव्याचे रोटेशन मिळावे

By admin | Updated: October 20, 2015 23:10 IST

शेतकरी संघटना : अधिकाऱ्यांना साकडे

येवला : तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांचा चारा व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी पालखेड धरणातून रोटेशन द्यावे, अशी मागणी येवला तालुका शेतकरी संघटना व बळीराज्य पाणी वापर सहकारी संस्थांच्या संघाने निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.शेतीला पाणी नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत याचा शासनाने विचार करावा. महानगरपालिका, नगरपालिका संस्थांना एकदाच बंद पाइपलाइनचा खर्च करावा लागणार आहे. त्याची सक्ती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.धरणामधून होणारा अतिउपसा, मार्गव्यय तूट, शहरातील पाणीवाटपाला थोडा कट लावल्यास शेतकऱ्यांसाठी किमान १००० द. ल. घ. फू.चे रोटेशन देणे शक्य होणार आहे. पाटबंधारे खात्याने या बाबींचा विचार करून तालुक्याला रोटेशन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.जायकवाडी धरणासाठी नाशिक, नगरहून सोडले जाणारे पाणी नदीमार्गाने देण्यात येते. त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. प्रत्यक्षात पैठणमध्ये किती पाणी पोहचते याचा पूर्वानुभव तपासावा. त्याऐवजी रेल्वेमार्गाने टँकर नेणे किंवा अन्य मार्गाचा अवलंब करावा अन्यथा या जिल्ह्यात आंदोलनाचा आगडोंब शासनालाही थांबविता येणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बळीराज्य पाणी वापर सहकारी संस्थांचा संघाचे चेअरमन संतू पा. झांबरे, व्हा. चेअरमन सुरेश कदम, शेतकरी संघटनेचे संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अरु ण जाधव, अनिस पटेल, बाळासाहेब गायकवाड, सुरेश जेजूरकर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)