शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आले साहेबाच्या मना...!

By admin | Updated: December 3, 2015 22:41 IST

मनमाड : जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने नागरिकांचा हिरमोड

मनमाड : गिरणाडॅम येथे बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी मनमाड शहराला भेट देणार असल्याने पालिकेच्या वतीने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र पाणी टंचाई, आरोग्य,रस्ते आदी समस्यांनी त्रस्त झालेले मनमाडकर जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचन्यासाठी ताटकळत पाच तास वाट पहात असताना त्यांचा दौरा रद्द झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. आले साहेबाच्या मना...तेथे कोणाचे चालेना ...याचा प्रत्यय आज मनमाडकरांनी अनुभवला.नाशिकचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशावह हे आज गुरुवारी नांदगाव तालुक्यात गिरणाडॅम येथील बैठक आटोपून मनमाड शहराला भेट देण्याचे नियोजन होते. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पालिकेने केलेले काम तसेच आरोग्य , पाणीटंचाई , रस्ते आदी कामांचा आढावा ते घेणार होते.साहेबांच्या आगमनामुळे शहरातील पालिका परिसरातील रस्ते चकाचक झाले होते.गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई ,स्वच्छता व आरोग्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या मनमाडकरांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या वृत्तामुळे दिलासा मिळाला . आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी नागरिकांसह काही पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या प्रतिक्षेत होते.शहरातील अतीक्रमणे , पालखेडच्या पाण्याच्या रोटेशनची मागणी आदी समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात येणार होती.तब्बल पाच तासांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजल्याने मनमाडकरांचा हिरमोड झाला. (वार्ताहर)