शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

उद्याने कोमेजली; बालके रुसली

By admin | Updated: May 6, 2016 00:31 IST

उन्हाळी सुटी : अपुऱ्या-नादुरुस्त खेळण्यांचे ग्रहण, पालिका प्रशासनाची उदासीनता

 नाशिक : महापालिकेने मोकळ्या भूखंडांवर उद्याने विकसित केली, मात्र या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनासह नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील मुख्य उद्यानांसह नववसाहतींमधील उद्यानेही केवळ नावापुरतीच राहिली आहेत. उद्याने बकाल झाली असून शहराची फुफ्फुसे निकामी बनत चालल्याने संताप व्यक्त होत आहे. उद्यानांमध्ये मद्यपींच्या ओल्या पार्ट्या व पत्त्यांचे डाव रंगविले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.एकीकडे शहरातील सत्ताधारी ‘नवनिर्माण’च्या पक्षप्रमुखांनी वन विभागाच्या बहरलेल्या उद्यानात वनौषधी उद्यान विकसित करण्यासाठी मंत्र्यांच्या दरबारी बैठका घेत मंजुरी मिळविली आहे; मात्र दुसरीकडे त्यांच्या अर्थात पालिकेच्या अखत्यारित असलेली उद्याने भकास झाली आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी उद्यानाच्या नशिबी वर्षानुवर्षांपासून दुरवस्था कायम असल्याने बालगोपाळांवरही उदास झाली आहेत. ऐन उन्हाळी सुटीत मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या बालकांचा प्रचंड हिरमोड होत असल्याने उद्यानांचे नवनिर्माण होणार तरी कधी, असा प्रश्न संतप्त नाशिककरांकडून केला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या आगामी नाशिक दौऱ्यात पालिकेच्या उद्यानांना भेटी देऊन ‘याचि देही याचि डोळा’ समस्यांची पाहणी करण्याची मागणी त्रस्त नाशिककरांनी केली आहे. त्याशिवाय पालिकेच्या प्रमुखांना उद्यानांची दुरवस्था थांबविण्याचा ‘मुहूर्त’ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम असल्यामुळे संध्याकाळ होताच शहरातील उद्याने गर्दीने फुलू लागतात. बालगोपाळ व त्यांचे पालक मोठ्या आशेने मौजमजेसाठी आपली पावले उद्यानांकडे वळवितात; मात्र उद्यानांची पायरी चढल्यानंतर त्यांच्या पदरी आनंदाऐवजी निराशा पडते. कारण उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था, मोडकळीस आलेली बाके, फुटलेले पथदीप, कचऱ्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या कुंड्या, डासांचा उपद्रव, अपुरे बाक अशा अनेक समस्यांचे ग्रहण उद्यानाला लागले आहे.