शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:22 IST

कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.

संजय शहाणे ।इंदिरानगर : कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.  महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक पोलीस किंवा महापालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरांच्या मुख्य रस्त्यांप्रमाणेच अन्य वसाहती, शाळा तेथील व्यवसाय या सर्वांचा विचार करून एकूणच वाहतुकीचे नियोजन करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.  इंदिरानगरमध्ये दिवसागणिक लोकवस्ती वाढत आहे. त्याचबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात ये-जा करण्यासाठी पेठेनगर रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर यादरम्यान चारचाकी वाहनांची तीन ते चार गॅरेज आहेत.संबंधित गॅरेजमध्ये ट्रक, कार आणि अन्य चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दुरु स्तीसाठी येत असल्याने जागेअभावी पेठेनगर रस्त्यावरच सर्रासपणे तासन्तास वाहनांची दुरुस्ती सुरू असते. रस्त्यावरच ट्रक किंवा मोटारी उभ्या करून दुरुस्ती केली जात असल्याने रस्ता अरुंद होतो, कित्येकदा समोरून येणारे वाहनही दिसत नाही. त्यामुळे अपघातही घडत असतात. मोटार गॅरजेमुळे त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे बनले आहे. दररोज लहान-मोठे अपघात घडून हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. तातडीने रस्त्यावरील वाहन दुरु स्ती थांबवून वाहतुकीस रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वतीने वाहतूक नियोजनाच्या बाबतीत शहराचा मध्यभाग किंवा उपनगरांच्या मध्यवर्ती भागावरच भर दिला जातो. इंदिरा नगर, पेठेनगर, सार्थकनगर, वडाळा-पाथर्डी रोड अशा ठिकाणी काय सुरू आहे, तेथील वाहतुकीचे तीन तेरा वाजत असेल तर काय केले पाहिजे याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही. परिणामी नवविकसित भागात वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करीत असून, त्यावर उपाय करण्याची गरज आहे.