शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:22 IST

कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.

संजय शहाणे ।इंदिरानगर : कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.  महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक पोलीस किंवा महापालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरांच्या मुख्य रस्त्यांप्रमाणेच अन्य वसाहती, शाळा तेथील व्यवसाय या सर्वांचा विचार करून एकूणच वाहतुकीचे नियोजन करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.  इंदिरानगरमध्ये दिवसागणिक लोकवस्ती वाढत आहे. त्याचबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात ये-जा करण्यासाठी पेठेनगर रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर यादरम्यान चारचाकी वाहनांची तीन ते चार गॅरेज आहेत.संबंधित गॅरेजमध्ये ट्रक, कार आणि अन्य चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दुरु स्तीसाठी येत असल्याने जागेअभावी पेठेनगर रस्त्यावरच सर्रासपणे तासन्तास वाहनांची दुरुस्ती सुरू असते. रस्त्यावरच ट्रक किंवा मोटारी उभ्या करून दुरुस्ती केली जात असल्याने रस्ता अरुंद होतो, कित्येकदा समोरून येणारे वाहनही दिसत नाही. त्यामुळे अपघातही घडत असतात. मोटार गॅरजेमुळे त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे बनले आहे. दररोज लहान-मोठे अपघात घडून हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. तातडीने रस्त्यावरील वाहन दुरु स्ती थांबवून वाहतुकीस रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वतीने वाहतूक नियोजनाच्या बाबतीत शहराचा मध्यभाग किंवा उपनगरांच्या मध्यवर्ती भागावरच भर दिला जातो. इंदिरा नगर, पेठेनगर, सार्थकनगर, वडाळा-पाथर्डी रोड अशा ठिकाणी काय सुरू आहे, तेथील वाहतुकीचे तीन तेरा वाजत असेल तर काय केले पाहिजे याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही. परिणामी नवविकसित भागात वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करीत असून, त्यावर उपाय करण्याची गरज आहे.