शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:22 IST

कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.

संजय शहाणे ।इंदिरानगर : कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.  महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक पोलीस किंवा महापालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरांच्या मुख्य रस्त्यांप्रमाणेच अन्य वसाहती, शाळा तेथील व्यवसाय या सर्वांचा विचार करून एकूणच वाहतुकीचे नियोजन करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.  इंदिरानगरमध्ये दिवसागणिक लोकवस्ती वाढत आहे. त्याचबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात ये-जा करण्यासाठी पेठेनगर रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर यादरम्यान चारचाकी वाहनांची तीन ते चार गॅरेज आहेत.संबंधित गॅरेजमध्ये ट्रक, कार आणि अन्य चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दुरु स्तीसाठी येत असल्याने जागेअभावी पेठेनगर रस्त्यावरच सर्रासपणे तासन्तास वाहनांची दुरुस्ती सुरू असते. रस्त्यावरच ट्रक किंवा मोटारी उभ्या करून दुरुस्ती केली जात असल्याने रस्ता अरुंद होतो, कित्येकदा समोरून येणारे वाहनही दिसत नाही. त्यामुळे अपघातही घडत असतात. मोटार गॅरजेमुळे त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे बनले आहे. दररोज लहान-मोठे अपघात घडून हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. तातडीने रस्त्यावरील वाहन दुरु स्ती थांबवून वाहतुकीस रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वतीने वाहतूक नियोजनाच्या बाबतीत शहराचा मध्यभाग किंवा उपनगरांच्या मध्यवर्ती भागावरच भर दिला जातो. इंदिरा नगर, पेठेनगर, सार्थकनगर, वडाळा-पाथर्डी रोड अशा ठिकाणी काय सुरू आहे, तेथील वाहतुकीचे तीन तेरा वाजत असेल तर काय केले पाहिजे याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही. परिणामी नवविकसित भागात वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करीत असून, त्यावर उपाय करण्याची गरज आहे.