शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

ग्रामपंचायतीने राबविले पाणीबचतीचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:37 IST

पाणी शुद्ध केल्यानंतर खराब समजले जाणारे पाणी बहुतेकदा फेकून देण्यात येते; परंतु पिंंपळगाव ग्रामपंचायतीने एक विशेष उपक्रम राबवून हे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला असून, त्यात त्यांना यश आले आहे. यात पाण्याची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. रोज सुमारे अडीच लाख लिटर पाणी सोडून दिले जात होते. आता या नवीन संकल्पनेमुळे अवघे तीस हजार लिटर पाणी सोडले जात आहे.

पिंपळगाव बसवंत : पाणी शुद्ध केल्यानंतर खराब समजले जाणारे पाणी बहुतेकदा फेकून देण्यात येते; परंतु पिंंपळगाव ग्रामपंचायतीने एक विशेष उपक्रम राबवून हे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला असून, त्यात त्यांना यश आले आहे. यात पाण्याची बचत होण्यास मोठी मदत  होणार आहे. रोज सुमारे अडीच लाख लिटर पाणी सोडून दिले जात होते. आता या नवीन संकल्पनेमुळे अवघे तीस हजार लिटर पाणी सोडले जात आहे. हे तीस हजार लिटर पाणी संपूर्ण गाळमिश्रित असल्याने ते सोडले जात आहे. जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर त्या टाकीला तळाशी साचलेला गाळ, अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करावा लागत होता. यानंतर ते पाणी उताराच्या दिशेने सोडून दिले जात होते. या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होत नव्हता. या पाण्याचे पुन्हा शुद्धिकरण होत नव्हते. पाच कोटी लिटर पाणी असे वाया जात होते. ही बाब लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य भास्कर बनकर यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या ही बाब लक्षात आणून दिली. रोज वाया जाणारे पाणी कसे वाचवायचे याबद्दल ग्रामपंचायतीने उपक्रम राबवायचे ठरविले. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी बघून पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष भास्कर बनकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदावरे यांच्याशी चर्चा केली. ग्रामपंचायतीचे सकारात्मक धोरण शुद्धिकरणाच्या टाक्या धुतल्यानंतर सोडून दिल्या जाणाºया पाण्याचा पुनर्वापर करता येणे शक्य असल्याची बाब ग्रामपंचायत सदस्य भास्कर बनकर व ग्रामसेवक लिंगराज जंगम यांच्या लक्षात आली असता हा पाणी वाचवा प्रकल्प उभा कसा करायचा, हा प्रश्न डोळ्यासमोर होता. कारण सरकारच्या सध्याच्या योजनांमध्ये तरतूद नसल्याचेही स्पष्ट होत होते. ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट येत असल्याने भास्कर बनकर यांनी ग्रामपंचायतीसमोर हा प्रस्ताव ठेवला.ग्रामपंचायतीनेही सकारात्मक विचार करून पाणीपुरवठा विभागाकडून त्याची तांत्रिक मान्यता घेतली व १९ लाख रु पये खर्च करून केंद्राबाहेर टाकल्या जाणाºया पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा उभारली.यासाठी त्यांनी दोन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी उभारली. व तेथूनच शुद्धिकरण केंद्राच्या स्वच्छतेनंतर ते अशुद्ध पाणी या टाकीत सोडले जाते. तेथे या पाण्यातील मातीचे कण तळाशी गेल्यावर ते पाणी पुन्हा शुद्धिकरण केंद्रात सोडले जाते व ते पुन्हा शुद्ध करून पिंपळगावच्या जलकुंभात सोडले जाते.