शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

गोरक्षेच्या नावाखाली होणाºया हल्ल्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:11 IST

आझादनगर : देशात गोरक्षाच्या नावाखाली अल्पसंख्याक व दलित समाजावर हल्ले करण्यात येत असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार घडणाºया घटनांना रोखण्यात सरकारला अपयश येत आहे. अशा हल्लेखोरांविरोधात कठोर कायदा करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे मालेगाव ते नाशिक ...

आझादनगर : देशात गोरक्षाच्या नावाखाली अल्पसंख्याक व दलित समाजावर हल्ले करण्यात येत असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार घडणाºया घटनांना रोखण्यात सरकारला अपयश येत आहे. अशा हल्लेखोरांविरोधात कठोर कायदा करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे मालेगाव ते नाशिक पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.  रविवारी दुपारी ३ वाजता उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शेख बोलत होते. यावेळी समितीचे उपाध्यक्ष भगवान आढाव, नगरसेवक विठ्ठल बर्वे, लतीफ बागवान, अब्दुल कय्युम, शहेजाद अख्तर, हलीम सिद्दीकी आदी उपस्थित होते. आमदार शेख पुढे म्हणाले, २०१४ पासून केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून विविध राज्यात गोहत्या व गोरक्षेच्या नावाखाली ५४ ठिकाणी हल्लेखोरांनी मुस्लीम व दलित समाजाच्या लोकांवर हल्ले केले. त्यात सुमारे २८ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. केंद्र सरकार असे हल्ले रोखण्यात अपयशी ठरत आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने जनावरे खरेदी-विक्रीच्या केंद्र सरकारच्या परिपत्रकास स्थगिती दिली. याचे स्मरण करून देत घटनेने सर्व समाजाला दिलेल्या अधिकाराला न जुमानता जातीयवादी संघटनांकडून देशातील समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत सरकारचा निषेध करीत अशा हल्लेखोरांवर कठोर कायद्याची निर्मिती करुन त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.समितीचे उपाध्यक्ष भगवान आढाव म्हणाले की, भाजपा सरकारने देशातील विभिन्न समाजाच्या आहारांवर अंकुश ठेवण्याचे काम केले आहे. एकीकडे गोवंश हत्याबंदी केली, तर दुसरीकडे मोदींच्या राज्यातच गुजरातमध्येच मोठ्या प्रमाणावर गायींचा मृत्यू होतोय. गोहत्येच्या नावाखाली मनुष्यांचीच हत्या केली जात आहे. संविधानाने दिलेला अधिकार हिरावून घेणाºयांनी मने साफ करून बोलावे तसे वागावे. दलित समाज जन्मताच संघर्ष करीत आहे. कायद्याने गोहत्याबंदी केली, त्याचे तंतोतंत पालन व्हावे, मात्र गोवंश पाळू नये असे कुठेही म्हटले नाही. अल्पसंख्याकांच्या घरासमोर बांधलेले पाळीव प्राणी कत्तलीसाठीच आहेत असा पोलीस निष्कर्ष कसे काढतात असा प्रश्न उपस्थित केला.दलितांना बरोबर घेत इन्सानियत बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या माध्यमातून येत्या १५ आॅगस्ट रोजी शहरातील शहीदोंकी यादगार ते नाशिक अशी पदयात्रा काढून दि. १९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी शहरात जनजागृतीसाठी विविध भागात सात सभा घेण्यात येत आहे. पहिली सभा सौलानी चौक येथे होणार असल्याचे शेख यांनी सांगितले.