शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आधारकार्ड केंद्र नसल्याने गंगापूरवासीय त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST

नाशिक : गंगापूर परिसरात एकही आधारकेंद्र नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, नवीन आधारकार्ड, नोंदणी, नावातील, ...

नाशिक : गंगापूर परिसरात एकही आधारकेंद्र नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, नवीन आधारकार्ड, नोंदणी, नावातील, फोटो, पत्ता बदल आदी विविध कामांसाठी नागरिकांना शहरात यावे लागत असून, तासंतास प्रतीक्षा करूनही काम होत नसल्याने नागरिकांच्या वेळेचे व पैशाचे नुकसान होत आहे. गंगापूर परिसरात जवळपास १० किलोमीटरच्या परिघात एकही आधारकेंद्र नसल्याने नागरिक संतप्त असून, या भागात लवकरात लवकर आधारकेंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शासकीय योजनेला अथवा निमशासकीय योजनेला आधारकार्ड प्रत्येक ठिकाणी मागितले जात असल्याने नागरिकांना ते अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीला नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाचे याकडे लक्षच नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही लोकप्रतिनिधीनेही शासनाचे याकडे लक्षही वेधले नाही. त्यामुळे गंगापूर, ध्रुवनगर, गोवर्धन, सोमेश्वर, जलालपूर, आंबेडकरनगर, महादेवपूर, सावरगाव, गंगव्हरे, रानमळा, शिवाजीनगर, धारणा परिसर आदी भागातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, लहान मुलांना, शेतावर जाणाऱ्या शेतमजुरांना आपले काम बंद करून १०-१० किलोमीटर लांब नाशिक शहराच्या ठिकाणी आधारकेंद्रावर आपल्या आधाराची दुरुस्ती असो अथवा नवीन आधार काढण्यासाठी जावे लागते. दरम्यान, नागरिकांची ही गरज बघता गंगापूर गावात आधार केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

इन्फो-

वेळेसोबतच पैसा खर्च

गंगापूर गावातील आजूबाजूच्या पाच ते सात किलोमीटरपर्यंत एकही आधार केंद्र नसल्याने ज्येष्ठ नागरिक, मजूर, शेतकरी यांना शहराच्या ठिकाणी आधार केंद्रावर नवीन आधारकार्ड अथवा दुरुस्तीसाठी जावे लागते, यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो. प्रशासनाकडून प्रत्येक शासकीय कार्यालयासह बँक, पोस्ट या ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून गंगापूर गाव व परिसरात कुठेही आधार केंद्र सुरू झालेले नाही.