शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

गंगापूर, दारणातून विसर्ग

By admin | Updated: November 4, 2015 23:52 IST

नियोजन : १४२७ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असून, बुधवार सकाळपर्यंत १४२७ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे रवाना झाले आहे. पाटबंधारे खात्याने कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे याचे नियोजन केल्यामुळे येत्या पंधरा दिवसांत टप्पाटप्प्याने पाणी सोडले जाईल, असे स्पष्ट केले आहे. दोन्ही धरणांतून न्यायालयाच्या निर्णयानुसार पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.त्याकडे त्यांनी पाठ फिरविली असली तरी, त्यानंतर नदीकाठच्या गावांमधील वीजपुरवठा खंडित करणे, पाणी चोरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याबाबतच्या सूचना वीज व पोलीस खात्याला देण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात असलेल्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या पाटबंधारे खात्याने बुधवारपासून पाणी सोडण्याची आपली तयारी पूर्ण केली असून, गंगापूर धरण समूहातून १३५५ दशलक्ष घनफूट तर दारणा समूहातून ४६१३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात येऊन गंगापूर धरणातून पाच दिवस तीन हजार क्युसेस व सात दिवस दोन हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. दारणा समूहातूनही तीन, पाच व पंधरा दिवसांपर्यंत जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणातून पाणी सोडण्यास स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नकार देत आंदोलन सुरू केल्यामुळे तूर्त गंगापूर व गौतमी गोदावरी या दोन धरणांतून पाणी सोडले जात आहे. कश्यपी धरणात ९४५ दशलक्ष घनफूट इतके पाणी आहे. जिल्हा प्रशासनाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबतचा आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, पाटबंधारे खात्याला पाण्याची गळती रोखण्याबाबत बजावले आहे. ते रोखण्यासाठी गोदाकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.