शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

गंगापूर धरणसाठा ९० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

नाशिक : कधी जोरदार पाऊस तर कधी रिमझिम धारा. मुसळधार पावसाचा अंदाजही फोल असताना धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणाचा ...

नाशिक : कधी जोरदार पाऊस तर कधी रिमझिम धारा. मुसळधार पावसाचा अंदाजही फोल असताना धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणाचा साठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणातील समाधानकारक साठ्यावरून नाशिक शहरावरील पाणी संकटही टळले आहे. असे असले तरी गतवर्षी या कालावधीत धरणाचा साठा हा ९४ टक्के इतका होता. यंदा जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे नाशिककरांना संमिश्र पावसाचा अनुभव आला आहे. जूनमध्ये पाऊस न झाल्याने पावसाने चिंता वाढविली असताना जुलैच्या मध्यानंतर काहीसा दिलासा मिळाला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानही झाले. त्यानंतर पुन्हा पावसाने झोडपून काढल्याने जिल्ह्यात पाऊस स्थिरावत असल्याचे वाटत असतानाच पुन्हा पावसाने ओढ दिली.

ऑगस्टमध्येही ऊन-सावलीचा खेळ कायमच बघायला मिळाला. मागील आठवड्यात संततधार सुरू झाली असतानाच कालपासून प्रखर ऊन पडू लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककरांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

यातही गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात झालेली वाढ समाधानकारक मानली जात आहे. सोमवारी (दि. २३) धरणाचा साठा ९० टक्के इतका होता तर समूहातील पाण्याची पातळी ८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. आळंदी धरण शंभर टक्के भरल्याने तेथून ३० क्युसेकचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत गंगापूर धरणात ९० टक्के, काश्यपी ६३, गौतमी गोदावरी ७२ तर आळंदी धरणात १०० टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा समूहातील पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. समूहातील साठा ८३ टक्के इतका असून, मागील वर्षी हाच साठा ७८ टक्के इतका होता.

गंगापूर धरणात समाधानकारक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यातील सात धरणांमध्ये अजूनही ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सद्य:परिस्थितीत ६४ टक्के पाणीसाठा आहे तर मागील वर्षी याच दिवशी ७३ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत ९ टक्यांनी साठा कमी आहे.

--इन्फो--

विसर्गही सुरू

जिल्ह्यातील धरण समूहांमध्ये अद्यापही अपेक्षित पाणीसाठा नसला तरी पाच धरण प्रकल्पांमधून किरकोळ स्वरूपाचा विसर्गही केला जात आहे. दारणातून १५०, भावली ७३, वालदेनी १८३, नांदुरमध्यमेश्वर ८०७, हरणबारीमधून ५२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.