शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणसाठा ९० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

नाशिक : कधी जोरदार पाऊस तर कधी रिमझिम धारा. मुसळधार पावसाचा अंदाजही फोल असताना धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणाचा ...

नाशिक : कधी जोरदार पाऊस तर कधी रिमझिम धारा. मुसळधार पावसाचा अंदाजही फोल असताना धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणाचा साठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणातील समाधानकारक साठ्यावरून नाशिक शहरावरील पाणी संकटही टळले आहे. असे असले तरी गतवर्षी या कालावधीत धरणाचा साठा हा ९४ टक्के इतका होता. यंदा जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे नाशिककरांना संमिश्र पावसाचा अनुभव आला आहे. जूनमध्ये पाऊस न झाल्याने पावसाने चिंता वाढविली असताना जुलैच्या मध्यानंतर काहीसा दिलासा मिळाला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानही झाले. त्यानंतर पुन्हा पावसाने झोडपून काढल्याने जिल्ह्यात पाऊस स्थिरावत असल्याचे वाटत असतानाच पुन्हा पावसाने ओढ दिली.

ऑगस्टमध्येही ऊन-सावलीचा खेळ कायमच बघायला मिळाला. मागील आठवड्यात संततधार सुरू झाली असतानाच कालपासून प्रखर ऊन पडू लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककरांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

यातही गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात झालेली वाढ समाधानकारक मानली जात आहे. सोमवारी (दि. २३) धरणाचा साठा ९० टक्के इतका होता तर समूहातील पाण्याची पातळी ८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. आळंदी धरण शंभर टक्के भरल्याने तेथून ३० क्युसेकचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत गंगापूर धरणात ९० टक्के, काश्यपी ६३, गौतमी गोदावरी ७२ तर आळंदी धरणात १०० टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा समूहातील पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. समूहातील साठा ८३ टक्के इतका असून, मागील वर्षी हाच साठा ७८ टक्के इतका होता.

गंगापूर धरणात समाधानकारक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यातील सात धरणांमध्ये अजूनही ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सद्य:परिस्थितीत ६४ टक्के पाणीसाठा आहे तर मागील वर्षी याच दिवशी ७३ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत ९ टक्यांनी साठा कमी आहे.

--इन्फो--

विसर्गही सुरू

जिल्ह्यातील धरण समूहांमध्ये अद्यापही अपेक्षित पाणीसाठा नसला तरी पाच धरण प्रकल्पांमधून किरकोळ स्वरूपाचा विसर्गही केला जात आहे. दारणातून १५०, भावली ७३, वालदेनी १८३, नांदुरमध्यमेश्वर ८०७, हरणबारीमधून ५२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.