शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर

By admin | Updated: August 12, 2016 23:00 IST

पाटबंधारे विभागाचे पत्र : कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी

नाशिक : गेल्या वर्षी जायकवाडीला पाणी सोडल्याने निर्माण झालेला तंटा, मराठवाड्यातील नेत्यांकडून होणारी चिथावणीखोर भाषा याचबरोबर धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांबरोबर सातत्याने कर्मचाऱ्यांशी होणारे वादविवाद या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. महापौरांसह निवासी उपजिल्हाधिकारी पाठोपाठ पाटबंधारे विभागानेही धरणाच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली असून ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे गंगापूर आणि कश्यपी धरणावर कायमस्वरूपी आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण सुमारे ८७ टक्के भरले आहे. शहरापासून १६ कि.मी.अंतरावर असलेल्या या धरणातून नाशिक शहराला पिण्यासाठी तसेच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासह सातपूर औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने मोठा तंटा उभा राहिला होता. त्यातच मराठवाड्यातील एका नेत्याने धरण बॉम्बने उडवून देण्याची चिथावणीखोर भाषा केली होती. आता धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने येत्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकदा पाण्यावरून तंटा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवरच महापौर अशोक मुर्तडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाकडे धरणावर पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली होती. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीही पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून त्याबाबत दखल घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाने ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून गंगापूर धरणावर चार आणि कश्यपी धरणावर चार याप्रमाणे आठ पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी पुरविण्याची मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी पत्रात म्हटले आहे, शहरापासून धरण जवळ असल्याने धरण पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढते आहे. गंगापूर धरण शाखेत सध्या आठ मजूर / चौकीदार कार्यरत असून दिवसपाळीसाठी धरण माथ्यावर दोन कर्मचारी, एक विश्रामगृहावर, तर एक धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असतो. त्याचप्रमाणे रात्रपाळीसाठी ४ कर्मचाऱ्यांमार्फत धरणाची सुरक्षितता पाहिली जात आहे. गंगापूर धरणाची लांबी ३.८ कि.मी. असून एवढ्या लांबीच्या धरण माथ्याचे संरक्षण करणे अवघड असल्याने गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. त्यासाठी दिवसपाळीसाठी दोन व रात्रपाळीपाळीसाठी दोन याप्रमाणे चार पोलिसांची गरज आहे. त्याचबरोबर कश्यपी धरणावरही प्रकल्पग्रस्तांकडून नेहमी आंदोलने होत असतात. बऱ्याचदा कश्यपी धरणावर प्रकल्पग्रस्त येऊन सेवाद्वार उघडून घेतात व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे कश्यपी धरणासाठीही दिवसपाळीत दोन, तर रात्रपाळीसाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने सदर पोलीस बंदोबस्त तातडीने पुरविण्याची मागणीही पाटबंधारे विभागाने केली आहे. (प्रतिनिधी)