शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर

By admin | Updated: August 12, 2016 23:00 IST

पाटबंधारे विभागाचे पत्र : कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी

नाशिक : गेल्या वर्षी जायकवाडीला पाणी सोडल्याने निर्माण झालेला तंटा, मराठवाड्यातील नेत्यांकडून होणारी चिथावणीखोर भाषा याचबरोबर धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांबरोबर सातत्याने कर्मचाऱ्यांशी होणारे वादविवाद या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. महापौरांसह निवासी उपजिल्हाधिकारी पाठोपाठ पाटबंधारे विभागानेही धरणाच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली असून ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे गंगापूर आणि कश्यपी धरणावर कायमस्वरूपी आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण सुमारे ८७ टक्के भरले आहे. शहरापासून १६ कि.मी.अंतरावर असलेल्या या धरणातून नाशिक शहराला पिण्यासाठी तसेच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासह सातपूर औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने मोठा तंटा उभा राहिला होता. त्यातच मराठवाड्यातील एका नेत्याने धरण बॉम्बने उडवून देण्याची चिथावणीखोर भाषा केली होती. आता धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने येत्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकदा पाण्यावरून तंटा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवरच महापौर अशोक मुर्तडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाकडे धरणावर पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली होती. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीही पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून त्याबाबत दखल घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाने ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून गंगापूर धरणावर चार आणि कश्यपी धरणावर चार याप्रमाणे आठ पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी पुरविण्याची मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी पत्रात म्हटले आहे, शहरापासून धरण जवळ असल्याने धरण पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढते आहे. गंगापूर धरण शाखेत सध्या आठ मजूर / चौकीदार कार्यरत असून दिवसपाळीसाठी धरण माथ्यावर दोन कर्मचारी, एक विश्रामगृहावर, तर एक धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असतो. त्याचप्रमाणे रात्रपाळीसाठी ४ कर्मचाऱ्यांमार्फत धरणाची सुरक्षितता पाहिली जात आहे. गंगापूर धरणाची लांबी ३.८ कि.मी. असून एवढ्या लांबीच्या धरण माथ्याचे संरक्षण करणे अवघड असल्याने गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. त्यासाठी दिवसपाळीसाठी दोन व रात्रपाळीपाळीसाठी दोन याप्रमाणे चार पोलिसांची गरज आहे. त्याचबरोबर कश्यपी धरणावरही प्रकल्पग्रस्तांकडून नेहमी आंदोलने होत असतात. बऱ्याचदा कश्यपी धरणावर प्रकल्पग्रस्त येऊन सेवाद्वार उघडून घेतात व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे कश्यपी धरणासाठीही दिवसपाळीत दोन, तर रात्रपाळीसाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने सदर पोलीस बंदोबस्त तातडीने पुरविण्याची मागणीही पाटबंधारे विभागाने केली आहे. (प्रतिनिधी)