शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून विसर्ग घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:23 IST

नाशिक शहरासह गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग रविवारी (दि.३०) दुपारी तीन हजाराने कमी करण्यात आला. साडेचार वाजेपासून नदीपात्रात दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू होता.

नाशिक : नाशिक शहरासह गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग रविवारी (दि.३०) दुपारी तीन हजाराने कमी करण्यात आला. साडेचार वाजेपासून नदीपात्रात दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू होता. शनिवारी सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत गंगापूर धरणातून ५ हजार १०९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हा विसर्ग रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत कायम राहिला. त्यानंतर जलसंपदा विभागाने विसर्ग कमी करत धरणाचे दरवाजे काही फुटापर्यंत खाली केले. दुपारी साडेचार वाजेपासून पुढे गंगापूर धरणातून केवळ दोन हजार ५५ क्यूसेक पाणी नदीपात्रात प्रवाहित होते. शनिवारी दुपारपासून शहरात पावसाने उघडीप दिली आहे. रविवारीही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रात प्रवाहित होणाºया पाण्याच्या पातळीतही तीन हजार क्यूसेकने घट झाली आहे. होळकर पुलाखालून दुपारी ४ हजार ८८८ क्यूसेक पाणी प्रवाहित आहे. पाच वाजेनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रातील पाण्याची पातळीही कमी झाली होती. गोदापात्रातील पाण्याची पातळीदेखील कमी झाली होती. गंगापूर धरणाचा जलसाठा ४ हजार ५४४ दलघफू इतका असून, धरण ८१ टक्के भरले आहे. शहर व परिसरात दिवसभरात ०.७ मि.मी. इतका अत्यल्प पाऊस झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने केली आहे.