शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गंगा आली रे अंगणी. .

By admin | Updated: August 4, 2016 00:30 IST

त्र्यंबकेश्वर जलमय : पाणीच पाणी चहुकडे

त्र्यंबकेश्वर : येथे पुराचे पाणी गावात कायम असून, ब्रह्मगिरीतील धबधबे वेगात वाहत होते. आज कुशावर्त तीर्थ संपूर्णपणे वरपर्यंत भरले होते. अनेकांनी ते उपसण्याचा प्रयत्न केला. विधीसाठी आलेल्या एका भाविकाला दारातूनच पिंडदान दारासमोरील नदीत वाहण्यास सांगितल्याने त्या भाविकाने पिंडदान करण्याठी गंगा आली रे अंगणी..! केवढे त्याचे भाग्य ! गावात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने पाहणी करण्याकरिता दीपक लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, यशवंत भोये, अभिजित काण्णव आदि फिरत होते. त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला.परिणामी गावातील विद्युतपुरवठा रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. तेली गल्लीत भूमिगत विद्युतवाहिन्या असल्याने खोलपर्यंत पाणी गेलेले असल्याने संपूर्ण गावाचा विद्युतपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात आले. त्र्यंबकला गेल्या तीन दिवसांपासून संततधार असून, आज दिवसभर मुसळधारेने शहराला झोडपून काढले. ‘गावात पाणीच पाणी चहुकडे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या रविवारपासून येथे पावसांची संततधार सुरू आहे. अवघ्या तीन दिवसात ४२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैअखेर केवळ ३२ दिवसांत ११२५ मिमीपावेतो पावसाची नोंद झाली आहे. रविवारी ६३ मिमी, सोमवारी १२८ मिमी, तर मंगळवारी २३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अधून मधून प्रचंड वेगाने सरी बरसत होत्या. नदीपात्रात काही ठिकाणी कचरा अडकल्याने गावात पाणी पातळीत वाढ होऊन मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पाणी कमी होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने गावात पाणी साचलेलेच आहे. कुशावर्त चौक, तेली गल्ली, भगवती चौक, लहान बजारपट्टी, मेनरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न. पा. कार्यालयासमोरील संपूर्ण रस्ता, गोदावरी पुलावरील रस्ता, कदम पेट्रोलपंपासमोरील रस्ता आदि ठिकाणे जवळपास २ ते ३ फूट पाण्याखाली गेली होती. या ठिकाणी बस व मोटारसायकल पाण्यात अडकून तेथेच बंद पडल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. (वार्ताहर)