शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

गणेशवाडी : १९५१ साली आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते अनावरण बाबासाहेबांच्या स्मृती जपणारा महात्मा फुलेंचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:08 IST

नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’.

ठळक मुद्देपुतळ्याचे अनावरण १९५१ साली अनावरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते

नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ असे म्हणणाऱ्या महात्मा जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ जोतिबा फुले यांची जयंती बुधवारी (दि.११) साजरी होत आहे. गणेशवाडी, पंचवटी परिसरात असलेला फुले यांचा अर्धाकृती पुतळा शहरातील अत्यंत जुना असून, या पुतळ्याचे अनावरण १९५१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्येष्ठ मराठी लेखक, विचारवंत व जनतेचे महात्मा असलेले जोतिबा फु ले यांनी महाराष्टÑात स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देत समतेचा नारा बुलंद केला. १९५१ साली पंचवटीतील गणेशवाडी भागात त्या वेळच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत फुले यांचा अर्धाकृती पुतळा उभारला. जेणेकरून येणाºया पिढीला म. फुले यांचे कार्य स्मरणात रहावे आणि त्यांनी त्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहितासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण फुले यांना गुरूस्थानी मानणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील रस्त्याला म. फुले यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी कार्यकारी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षपदी बाबुराव गिते होते तर कार्यकारी मंडळात कर्मवीर बी. के. गायकवाड, गोपाळराव शिंदे आदींचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला गणेशवाडीमधील महात्मा फुलेंचा पुतळा फुले-शाहू-आंबेडकर चळवळीला बळ देणारा ठरत आहे; मात्र काळाच्या ओघात याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व विकासाकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. परिसरातील युवकांनी फुले यांच्या पुतळ्याला रोषणाई केली आहे. या पुतळ्याभोवती सुशोभिकरण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींसह फुलेंच्या स्मृती महापालिकेने जोपासणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज अन् राष्टÑाच्या विकासासाठी विविध सत्याग्रह, आंदोलने उभारुन लढा दिला. संपूर्ण आयुष्य त्यांनी राष्टÑ उद्धारासाठी वेचले. नाशिकमध्ये १९५१ साली दुर्मीळ योग आला तो म्हणजे बाबासाहेबांनी स्वत: महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. नाशिकमध्ये गणेशवाडी येथे असलेला म. फुले यांचा पुतळा ६७ वर्षांनंतरही डॉ. आंबेडकर यांच्या नाशिकभेटीच्या स्मृती जपत असून भावीपिढीला प्रेरणा देत आहे.