शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गणेशवाडी : १९५१ साली आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते अनावरण बाबासाहेबांच्या स्मृती जपणारा महात्मा फुलेंचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:08 IST

नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’.

ठळक मुद्देपुतळ्याचे अनावरण १९५१ साली अनावरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते

नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ असे म्हणणाऱ्या महात्मा जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ जोतिबा फुले यांची जयंती बुधवारी (दि.११) साजरी होत आहे. गणेशवाडी, पंचवटी परिसरात असलेला फुले यांचा अर्धाकृती पुतळा शहरातील अत्यंत जुना असून, या पुतळ्याचे अनावरण १९५१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्येष्ठ मराठी लेखक, विचारवंत व जनतेचे महात्मा असलेले जोतिबा फु ले यांनी महाराष्टÑात स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देत समतेचा नारा बुलंद केला. १९५१ साली पंचवटीतील गणेशवाडी भागात त्या वेळच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत फुले यांचा अर्धाकृती पुतळा उभारला. जेणेकरून येणाºया पिढीला म. फुले यांचे कार्य स्मरणात रहावे आणि त्यांनी त्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहितासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण फुले यांना गुरूस्थानी मानणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील रस्त्याला म. फुले यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी कार्यकारी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षपदी बाबुराव गिते होते तर कार्यकारी मंडळात कर्मवीर बी. के. गायकवाड, गोपाळराव शिंदे आदींचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला गणेशवाडीमधील महात्मा फुलेंचा पुतळा फुले-शाहू-आंबेडकर चळवळीला बळ देणारा ठरत आहे; मात्र काळाच्या ओघात याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व विकासाकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. परिसरातील युवकांनी फुले यांच्या पुतळ्याला रोषणाई केली आहे. या पुतळ्याभोवती सुशोभिकरण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींसह फुलेंच्या स्मृती महापालिकेने जोपासणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज अन् राष्टÑाच्या विकासासाठी विविध सत्याग्रह, आंदोलने उभारुन लढा दिला. संपूर्ण आयुष्य त्यांनी राष्टÑ उद्धारासाठी वेचले. नाशिकमध्ये १९५१ साली दुर्मीळ योग आला तो म्हणजे बाबासाहेबांनी स्वत: महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. नाशिकमध्ये गणेशवाडी येथे असलेला म. फुले यांचा पुतळा ६७ वर्षांनंतरही डॉ. आंबेडकर यांच्या नाशिकभेटीच्या स्मृती जपत असून भावीपिढीला प्रेरणा देत आहे.