शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशवाडी : १९५१ साली आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते अनावरण बाबासाहेबांच्या स्मृती जपणारा महात्मा फुलेंचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:08 IST

नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’.

ठळक मुद्देपुतळ्याचे अनावरण १९५१ साली अनावरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते

नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ असे म्हणणाऱ्या महात्मा जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ जोतिबा फुले यांची जयंती बुधवारी (दि.११) साजरी होत आहे. गणेशवाडी, पंचवटी परिसरात असलेला फुले यांचा अर्धाकृती पुतळा शहरातील अत्यंत जुना असून, या पुतळ्याचे अनावरण १९५१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्येष्ठ मराठी लेखक, विचारवंत व जनतेचे महात्मा असलेले जोतिबा फु ले यांनी महाराष्टÑात स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देत समतेचा नारा बुलंद केला. १९५१ साली पंचवटीतील गणेशवाडी भागात त्या वेळच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत फुले यांचा अर्धाकृती पुतळा उभारला. जेणेकरून येणाºया पिढीला म. फुले यांचे कार्य स्मरणात रहावे आणि त्यांनी त्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहितासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण फुले यांना गुरूस्थानी मानणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील रस्त्याला म. फुले यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी कार्यकारी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षपदी बाबुराव गिते होते तर कार्यकारी मंडळात कर्मवीर बी. के. गायकवाड, गोपाळराव शिंदे आदींचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला गणेशवाडीमधील महात्मा फुलेंचा पुतळा फुले-शाहू-आंबेडकर चळवळीला बळ देणारा ठरत आहे; मात्र काळाच्या ओघात याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व विकासाकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. परिसरातील युवकांनी फुले यांच्या पुतळ्याला रोषणाई केली आहे. या पुतळ्याभोवती सुशोभिकरण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींसह फुलेंच्या स्मृती महापालिकेने जोपासणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज अन् राष्टÑाच्या विकासासाठी विविध सत्याग्रह, आंदोलने उभारुन लढा दिला. संपूर्ण आयुष्य त्यांनी राष्टÑ उद्धारासाठी वेचले. नाशिकमध्ये १९५१ साली दुर्मीळ योग आला तो म्हणजे बाबासाहेबांनी स्वत: महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. नाशिकमध्ये गणेशवाडी येथे असलेला म. फुले यांचा पुतळा ६७ वर्षांनंतरही डॉ. आंबेडकर यांच्या नाशिकभेटीच्या स्मृती जपत असून भावीपिढीला प्रेरणा देत आहे.