शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडला यंदा गणेश विसर्जनास मनाई

By admin | Updated: August 28, 2014 01:13 IST

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जेलरोड दसक गोदावरी घाटाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी यावर्षी श्री गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही.

 सतर्कता :दसक गोदाघाटाच्या विस्तारीकरणामुळे निर्बंध; नांदूर घाटाचा पर्याय

नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जेलरोड दसक गोदावरी घाटाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी यावर्षी श्री गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे भाविकांना नांदूर घाटावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे लागणार आहे.देवळालीगाव येथील वालदेवी नदीपात्रात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे जेलरोड दसक येथे गोदावरी नदीचे पात्र व घाटदेखील मोठा असल्याने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविक प्राधान्य देतात. घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या हजारो मूर्तीचे दसक गोदावरी नदी पात्रात विसर्जन होते. घाटाचे विस्तारीकरणसिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मनपा प्रशासनाकडून दसक गोदावरी नदीकिनारी घाटाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या ज्या ठिकाणी घाट बांधला आहे त्या ठिकाणी भाविकांना अंघोळ सहजरीत्या करण्यात यावी म्हणून नदीपात्रात आणखीन सहा पायर्‍या बांधल्या जात आहे. तसेच नदीपात्राच्या किनारी जेथे घाट बांधलेला नाही तेथे घाट बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे घाटालगतच नदीपात्रात मोठमोठे खड्डे करण्यात आले असून, घाटाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अपघात टाळण्यासाठी..दसक गोदाघाटावर गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी होते. घाटाचे कामामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून यंदाच्या वर्षी दसक गोदाघाटावर श्री गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, नगरसेवक अशोक सातभाई, विभागीय अधिकारी किशोर चव्हाण, बांधकाम उपअभियंता नीलेश साळी, कनिष्ठ अभियंता विशाल गरुड यांनी आज संयुक्तरीत्या पाहणी करून दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे यंदा गोदावरी नदीच्या पलीकडच्या नांदूर तीरावरील घाटावर मूर्ती विसर्जन करण्यासाठी जावे लागणार आहे.

पुलावरील खड्डे बुजवून डांबरीकरणाची गरज

■ जेलरोड येथील श्री संत जनार्दन स्वामी पुलाच्या रस्त्याची प्रचंड वाताहत झाली असून, सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत त्या ठिकाणाहून वाहने चालवावी लागतात. विसर्जनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मनपा प्रशासनाने सर्वप्रथम श्री संत जनार्दन स्वामी पुलावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची गरज आहे. 

(प्रतिनिधी)