शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गांधीजींची वैद्यकीय दृष्टीदेखील महान: आशिष सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:29 IST

महात्मा गांधी यांचा जीवनाकडील दृष्टिकोन वैद्यकीयदृष्ट्या शास्त्रोक्त आणि क्रांतिकारी होता, असे प्रतिपादन मेळघाटातील आदिवासींसाठी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी जीवन समर्पित केलेले डॉ. आशिष सातव यांनी केले.

ठळक मुद्देगांधी विचारमालेचा समारोप

नाशिक : महात्मा गांधी यांचा जीवनाकडील दृष्टिकोन वैद्यकीयदृष्ट्या शास्त्रोक्त आणि क्रांतिकारी होता, असे प्रतिपादन मेळघाटातील आदिवासींसाठी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी जीवन समर्पित केलेले डॉ. आशिष सातव यांनी केले.सावानाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी विचारमालेचा डॉ. सातव यांच्या भाषणाने समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना, गांधीजी यांच्याकडे मी शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून पाहतो, तेव्हादेखील ते मला आदर्श वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.सध्याच्या काळात शरीरश्रम नसल्यामुळेच अनेक आजार बळावत असल्याचे दिसून येते, असे डॉ. सातव यांनी नमूद करत गांधीजींनी निर्भय बनण्याचा संदेश देऊन संपूर्ण समाजात निर्भयता आणण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय स्वदेशी, नैसर्गिक शेती असे त्यांचे सगळे दृष्टिकोन हे निरामयी आरोग्याच्या दृष्टीने क्रांतिकारी असल्याचेही डॉ. सातव यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मो. स. गोसावी यांनी गांधीजींचे संपूर्ण विश्वातील स्थान आणि कार्याचे श्रेष्ठत्व अधोरेखित केले. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, किशोर पाठक, वसंत खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. गिरीश नातू यांनी सूत्रसंचालन, तर कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. आभार अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक