शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देत केली गांधीगिरी

By admin | Updated: July 8, 2017 00:09 IST

नाशिक : पॉलिहाउस आणि शेडनेटसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ दीड लाखांच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न करता पॉलिहाउस आणि शेडनेटसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देऊन स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्णातील पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.दुपारी कालिदास कलामंदिर परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शालिमार, शिवाजीरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काही काळ मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करीत नंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना पुष्पगुच्छ देत गांधीगिरी करीत पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे साकडे घातले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. सरकारने याचा पुनर्विचार करावा. तसेच पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना कोणत्याही अटी न लावता सरसकट कर्जमाफी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी २००८-०९ पासून हाताला काही काम नसल्याने पॉलिहाउस व शेडनेटची निर्मिती केली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले; मात्र फयानसारख्या वादळामुळे अनेक पॉलिहाउस व शेडनेट उद्ध्वस्त झाले. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जबाजारी झाले. पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, शाश्वत शेतीसाठी शाश्वत पाणी व वीज उपलब्ध करून द्यावी, जिल्ह्णातून हवाई शेतमाल वाहतूक व वातानुकूलित रेल्वे वाहतूक सुरू करावी यांसह विविध मागण्यांचा समावेश होता.