शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देत केली गांधीगिरी

By admin | Updated: July 8, 2017 00:09 IST

नाशिक : पॉलिहाउस आणि शेडनेटसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ दीड लाखांच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न करता पॉलिहाउस आणि शेडनेटसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देऊन स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्णातील पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.दुपारी कालिदास कलामंदिर परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शालिमार, शिवाजीरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काही काळ मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करीत नंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना पुष्पगुच्छ देत गांधीगिरी करीत पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे साकडे घातले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. सरकारने याचा पुनर्विचार करावा. तसेच पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना कोणत्याही अटी न लावता सरसकट कर्जमाफी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी २००८-०९ पासून हाताला काही काम नसल्याने पॉलिहाउस व शेडनेटची निर्मिती केली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले; मात्र फयानसारख्या वादळामुळे अनेक पॉलिहाउस व शेडनेट उद्ध्वस्त झाले. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जबाजारी झाले. पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, शाश्वत शेतीसाठी शाश्वत पाणी व वीज उपलब्ध करून द्यावी, जिल्ह्णातून हवाई शेतमाल वाहतूक व वातानुकूलित रेल्वे वाहतूक सुरू करावी यांसह विविध मागण्यांचा समावेश होता.