शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गावठी कट्टे अन् जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:27 IST

आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत जिल्ह्यात कोठेही कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी ग्रामीण पोलीस दलाला ‘अलर्ट’ दिला आहे.

नाशिक : आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत जिल्ह्यात कोठेही कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी ग्रामीण पोलीस दलाला ‘अलर्ट’ दिला आहे. ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात आचारसंहिता काळात चोख बंदोबस्त ठेवत ५० तलवारींसह पाच गावठी कट्टे, डझनभर जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.लोकसभा निवडणूक काळात कोठेही कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यादृष्टीने शहर व ग्रामीण पोलीस दक्षता घेत आहेत. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेसह, ग्रामीण सायबर पोलिसांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून जिल्ह्यतील कुठल्याही कोपऱ्यात गुन्हे घडविण्याचा प्रयत्न होत असल्यास गुन्हेगारांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यानुसार जिल्ह्यात विशेष पथके गस्तीवर आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यापासून अद्याप जिल्ह्यातील ४७ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ५७ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव पुढे कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पेठ गावाजवळ निवडणूक आयोगाचे भरारी पथक व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत सुमारे १९ लाख रुपयांची रोकड एका मोटारीतून जप्त केली होती. तसेच अद्याप जिल्ह्यात विविध ठिकाणी चालणारे हातभट्टी दारूचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात आले असून आतापर्यंत २० हजार ८३६ लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे १७ लाख १४ हजार ८१३ रुपये इतकी आहे. तसेच जायखेडा शिवारात नंदुरबारच्या सीमेजवळ ग्रामीण पोलिसांनी २ हजार १५० जिलेटीन कांड्या व १ हजार ७५० डेटोनेटरचा साठा जप्त करत राजस्थानच्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. जिल्'ातील ३१८ गुन्हेगारांपैकी ३२२ संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.मोदींची सभा; यंत्रणा सज्जपिंपळगाव बसवंत येथे येत्या सोमवारी (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, सभास्थळी जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान मोदी यांची सभा जिल्ह्यात होऊ घातल्याने साहजिकच सुरक्षाव्यवस्थादेखील तितकीच महत्त्वाची असल्यामुळे दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी वैयक्तिकपणे चोख सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष देत संपूर्ण बंदोबस्ताची आखणी केली आहे. कुठल्याही प्रकारे बंदोबस्तात उणीव राहणार नाही, याबाबत ग्रामीण पोलीस प्रशासन खबरदारी घेताना दिसून येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक