शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर ठरणार शिक्षकांच्या पगाराचे भविष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST

शासनाचे सदर धोरणाचा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे. शिक्षण विभागाने याला दुजोरा दिला आहे. यामध्ये ...

शासनाचे सदर धोरणाचा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे. शिक्षण विभागाने याला दुजोरा दिला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चाचणी घेतली जाणार आणि त्यामधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवली जाणार असल्याने संबंधित शाळा व शिक्षक यांच्यावरसुद्धा शिक्षण विभागाचा विश्वास राहिलेला नाही. त्रयस्थ यंत्रणा फुकट परीक्षा घेणार नाहीत. त्यासाठी निविदा काढून त्यानंतर शासन विद्यार्थ्यांची चाचणी घेणार आहे. चाचणीतील गुणांचे प्रमाण किती आहे, याचा अंदाज घेऊन त्यावरच आधारित शिक्षकांचे वेतन निश्चित करण्यात येणार आहे. याबाबत उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी सांगितले की, फक्त एका चाचणीतून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी ठरवली जाईल? विद्यार्थी विकास हा फक्त शाळेतच होतो आणि एक चाचणीतून तो समजत नाही. शासनाने असेच गृहीत धरले आहे का की विद्यार्थ्याचे घर व आजूबाजूचे वातावरण खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर अनुवांशिकता व परिसर कारणीभूत असतो. अनुवांशिकता व परिसर यांना मानसशास्त्र समान मानते. या दोघांची भूमिका ही महत्त्वाची ठरते. या दोन्ही गोष्टींकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून केवळ आणि केवळ शिक्षकांचे अध्यापन आणि चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण यावरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवली जाणार आहे. राज्य सरकारने असा निर्णय घेऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने केली आहे.