शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

शासनाच्या नियमांवर भाषेचे भवितव्य अवलंबून नाही

By admin | Updated: February 27, 2017 01:33 IST

नाशिक : मराठी भाषेचे भवितव्य शासनाच्या नियमावर अवलंबून नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी ‘विशाखा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

उत्तम कांबळे : मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला विशाखा पुरस्कार सोहळ्याचे वितरणनाशिक : मराठी भाषेवर गंभीर चर्चा होत नाही ही मराठी भाषेची शोकांतिका आहे. मराठी भाषेचे भवितव्य शासनाच्या नियमावर अवलंबून नाही, तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कितपत चर्चा केली जाते यावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार उत्तम कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आयोजित ‘विशाखा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. महाकवी कालिदास मंदिर येथे रविवारी (दि. २६) या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे विशाखा पुरस्कार योगिनी सतारकर - पांडे (नांदेड), मोहन कुंभार (सिंधुदुर्ग) आणि विष्णु थोरे (चांदवड, नाशिक) यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्तम कांबळे यांनी पुढे बोलताना जागतिकीकरणामुळे तसेच खासगीकरणामुळे समाजापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. तसेच ती मराठी भाषेपुढेदेखील आहेत. भाषेशी असलेल्या नातेसंबंधांवर भाषेचे भविष्य अवलंबून असल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले. भाबडेपणाने भाषेचा व्यवहार करण्यापेक्षा भाषा संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे याकडे कांबळे यांनी यावेळी लक्ष वेधले. मनोगत व्यक्त करताना पुरस्कारार्थींनी आपली जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी केले, तर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्राच्या संचालक डॉ. विजया पाटील यांनी विशाखा पुरस्काराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी आपल्या मनोगतातून पुरस्कारप्राप्त कवींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)हे पुरस्कारार्थी सन्मानितविशाखा पुरस्काराअंतर्गत यावर्षीचा प्रथम पुरस्कार नांदेड येथील कवयित्री डॉ. योगिनी सातारकर - पांडे यांच्या ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ या कविता संग्रहाला मिळाला. एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार सिंधुदुर्ग येथील कवी मोहन कुंभार यांच्या ‘जगण्याची गाथा’ या काव्यसंग्रहास मिळाला. पंधरा हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर तिसरा क्रमांक चांदवड, नाशिक येथील कवी विष्णू थोरे यांच्या ‘धूळपेरा उसवता’ या काव्यसंग्रहाला मिळाला. दहा हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.