शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

शहरातील गणेश मंडळांचा प्रशासनाच्या विरोधात रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:32 IST

उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे गणेश मंडळांमध्ये प्रशासनाच्या विरोधात निर्माण झालेला रोष वाढत चालला असून, प्रशासनातील अधिकाºयांनी सबुरीने घ्यावे, यासाठी आता राजकीय दबावही टाकण्यात येत आहे.

नाशिक : उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे गणेश मंडळांमध्ये प्रशासनाच्या विरोधात निर्माण झालेला रोष वाढत चालला असून, प्रशासनातील अधिकाºयांनी सबुरीने घ्यावे, यासाठी आता राजकीय दबावही टाकण्यात येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यावरच गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यात येत असल्याने त्या संदर्भात उच्च न्यायालयाने जनहित याचिकेद्वारे नियमावली ठरवून दिली आहे. सध्या गणेशोत्सवाची तयारी वेगात सुरू असून, मंडळांकडून मंडप उभारणीचे काम केले जात असतानाच उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी प्रशासनातील अधिकाºयांचे पथक प्रत्येक मंडळाला भेट देऊन त्यांच्याकडून नियम, निकषांची पूर्तता करून घेत आहे. त्यासाठी विविध परवानग्यांचा आग्रह धरला जात असून, रहदारीस अडथळा ठरणाºया मंडपांना परवानगी नाकारली जात असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. ऐन उत्सवाच्या तोंडावरच प्रशासनाने कठोर पावले उचलल्यामुळे उत्साहावर विरजण पडले असून, बºयाच मंडळांनी केलेली तयारी वाया गेली आहे तर काहींना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला आहे. उत्सवाच्या तीन दिवस अगोदर मंडळांनी सर्व शासकीय अनुमत्या घेणे बंधनकारक करण्यात आल्याने गणेशभक्तांची त्यासाठी धावपळ सुरू असताना त्यात दररोज नवनवीन अटी, शर्तींची भर टाकण्यात येत असल्याने सार्वजनिक मंडळे एकत्र येऊ लागली आहेत. प्रशासनाचा अन्याय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींना मध्यस्थी करण्यासाठी गळ घातली जात आहे. राजकीय पक्ष व त्यांच्या पदाधिकाºयांसाठीदेखील गणेशोत्सव हा तितकाच महत्त्वाचा उत्सव असून, त्या माध्यमातून आपला राजकीय स्वार्थ साधणाºया लोकप्रतिनिधींनी याबाबत थेट अधिकाºयांनाच संपर्क साधून सबुरीने घेण्याची गळ घालण्यास सुरुवात केली आहे.