शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संताप व्यक्त : सक्तीची वसुली थांबविण्याच्या आदेशाचे उल्लंघन शेतकऱ्यांना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:02 IST

आडगाव : शेतकºयांकडून शेतीपंपाच्या वीजबिलांची सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले असल्याने सक्तीच्या कारवाईचे संकट थांबले असले, तरी सदोष वीजबिलांमुळे शॉक बसला आहे.

ठळक मुद्देवीजबिलापेक्षा चारपट हजारो रुपयांची बिले महावितरणकडून देण्यात आलीफोटोची जागा रिक्त असलेले वीजबिल पाठवले जात आहे

आडगाव : शेतकºयांकडून शेतीपंपाच्या वीजबिलांची सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले असल्याने सक्तीच्या कारवाईचे संकट तात्पुरते थांबले असले, तरी शेतकºयांना गेल्या अनेक महिन्यांपासून येणाºया सदोष वीजबिलांमुळे शॉक बसला आहे. वीजबिलांच्या माध्यमातून लूट केली जात असल्याने महावितरणच्या कर्मचाºयांना शेतकºयांच्या परिस्थितीची जाणीव नाही का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. म्हसरूळ शिवारातील अनेक शेतकºयांना चालू महिन्यात नियमित येणाºया वीजबिलापेक्षा चारपट हजारो रुपयांची बिले महावितरणकडून देण्यात आली आहेत. महावितरणकडून ग्राहकांना हिताचे आणि सोयीस्कर असणाºया मीटरचा फोटो असलेले वीजबिल देण्याची पद्धत ग्राहकांना संभ्रमात टाकत आहे. महावितरणद्वारे देण्यात येणाºया बिलांवरील फोटो हे अस्पष्ट असल्याने नागरिकांना नेमका आपल्याच मीटरचा हा फोटा आहे का, त्याचे रीडिंग किती याची कल्पना येत नसल्याने महावितरण विरोधात संतापाचे वातावरण आहे. शिवाय काही वीजबिलांचे तर फोटोच काढलेले नसल्याने फोटोची जागा रिक्त असलेले वीजबिल पाठवले जात आहे. महावितरण आपल्या चुका झाकण्यासाठी नवनवीन प्रयोग करत ग्राहकांची लूट करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.बरेच शेतकरी वीजबिल आल्यानंतर ते भरतात. पण किती रीडिंग होते, नंतर किती आले याची शहानिशा करत नाहीत. बिल भरतात किंवा अडचण असल्यास वर्षाचे एकदम रक्कम अदा करतात. पण त्यावेळी मागचे बिल बघत नाहीत. त्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याची तक्र ार आहे. चालू महिन्यात अनेक शेतकºयांना सदोष वीजबिल देण्यात आले आहे . त्यावर मीटरचा फोटो नाही किंवा मागच्या बिलाचा कोणताही विचार न करता अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली असल्याचे शेतकरी सांगतात. अनेक शेतकºयांच्या बिलांवर बिल आकारणीचे रीडिंगचे आकडेदेखील १८६५, २७९५ देखील सारखेच आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त असून, लवकरच महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.