शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रस्ते दुरुस्तीला नियोजन समितीतून निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:36 IST

नाशिक : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्टÑ खड्डेमुक्त करण्याचा विडा उचलला पण, जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करण्याची सर्वपक्षीय सदस्यांची मागणी लक्षात घेता, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या रस्ते दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्याची घोषणा केली, मात्र रस्ते दुरुस्त करताना त्या कामाच्या तपशीलाचे फलक ठेकेदारांना लावण्याचे बंधनकारक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

ठळक मुद्देगिरीश महाजन : कामाच्या ठिकाणी तपशिलाचे फलक लावाजिल्हा परिषदेच्या रस्ते दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्याची घोषणा

नाशिक : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्टÑ खड्डेमुक्त करण्याचा विडा उचलला पण, जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करण्याची सर्वपक्षीय सदस्यांची मागणी लक्षात घेता, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या रस्ते दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्याची घोषणा केली, मात्र रस्ते दुरुस्त करताना त्या कामाच्या तपशीलाचे फलक ठेकेदारांना लावण्याचे बंधनकारक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नरहरी झिरवाळ यांनी या विषयाला वाचा फोडली. ते म्हणाले, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, आमदारांना रस्ते दुरुस्तीचे कामे सुचविता येत नाही व जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याचे कारण पुढे करून रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खराब रस्त्यांमुळे एस. टी. महामंडळाच्या बसेसचे नुकसान होत असल्यामुळे त्यांनी बसफेºयाच रद्द केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला आमदार डॉ. राहुल अहेर यांनीही पाठिंबा दर्शविला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे नियोजन करताना तालुकानिहाय किती निधी दिला गेला याची माहिती लोकप्रतिनिधींना दिली जात नसल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रस्त्यांचे कामे सुचविताना जिल्हा परिषदेला ६० टक्के, तर ४० टक्के अधिकार लोकप्रतिनिधींना दिले जावेत असा ठराव करण्यात यावा, अशी मागणी केली. आमदार अनिल कदम यांनीही या मागणीचा पुनरुच्चार करून ग्रामीण भागातील जनताखराब रस्त्याबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारत असल्याचे सांगितले. यावेळी सहकारराज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्याअध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मीना आदी उपस्थित होते.माहिती जाहीर केली जावी गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी नियोजन समितीतून निधीची तरतूद करण्यात येईल, परंतु खराब रस्त्याचे काम करताना त्याचा दर्जा व गुणवत्ता राखला जावा, त्यासाठी ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी तपशीलवार फलक लावून कामाची लांबी, रुंदी, खर्च, ठेकेदाराचे नाव याची माहिती जाहीर केली जावी तसेच या कामांवर लोकप्रतिनिधींनीदेखील लक्ष ठेवून काम चांगले होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.