शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

त्र्यंबकेश्वरला प्रसाद योजनेच्या कामांना निधीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 23:14 IST

त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या पर्यटन विकास विभागामार्फत प्रसाद योजनांची कामे भारतात आठ ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सुचवलेल्या प्रमाणे सुरू केली होती. ही कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकामांना मुहूर्ताची प्रतीक्षा : पाच वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या योजनेला घरघर

वसंत तिवडेत्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या पर्यटन विकास विभागामार्फत प्रसाद योजनांची कामे भारतात आठ ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सुचवलेल्या प्रमाणे सुरू केली होती. ही कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आली आहेत.

याशिवाय या कामांना केंद्र सरकारकडून येणारा निधीही थांबविण्यात आल्याने ही योजना बंद पडते की काय, अशी भीतीही निर्माण झाली होती. आता कोरोनामुळे बंद करण्यात आलेली कामे केव्हाच सुरू झाली आहेत, मात्र त्र्यंबकेश्वर, अंजनेरीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. ही कामे निधीअभावी रखडल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातील अभियंता महेश बागुल यांनी निधी प्राप्त होताच काम सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.केंद्र सरकारने भारतातील आठ तीर्थक्षेत्रांचा विकास प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे ठरवले. त्यात महाराष्ट्रातील एकमेव तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा समावेश करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून पर्यटन वाढावे, तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, जीर्ण पुरातन मंदिरांचा जीर्णोध्दार व्हावा. पुरातन मंदिरांचे गतवैभव त्यांना पुन्हा मिळवून द्यावे व त्यांचे पुरातत्व जपावे या सदहेतूने केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी दि.१६ ऑगस्ट २०१६ रोजी देशातील फक्त आठ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी 'प्रसाद' योजनेअंतर्गत विकास करण्याची घोषणा करत केंद्रीय पर्यटन विभागांतर्गत मंजुरीही दिली होता. त्यात महाराष्ट्रातील एकमेव त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंग असलेल्या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरचा विकास करण्याबरोबर अंजनेरी येथील पुरातन हेमाडपंती जैन मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याचे कामदेखील करण्यात येत आहे. यासाठी सन २०१४-१५ च्या अंदाजपत्रकामध्ये तशी तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी गोव्यातील एक प्रतिथयश वास्तुविशारद एजन्सीजचे मिलिंद रमाणी यांना काम देण्यात आले आहे.१५ पैकी केवळ दोन कामे पूर्णत्र्यंबकेश्वर येथील कामे महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या अखत्यारित व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू होती. त्र्यंबकेश्वरची कामे नाशिकच्या स्पेक्ट्रम कन्स्ट्रक्शन्स या बांधकाम करणाऱ्या कंपनीला मिळाले आहे. मात्र एकूण १५ कामांपैकी फक्त दोन कामे पूर्ण झाली आहेत, तर १३ कामांपैकी काही कामे अर्धवट आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थानची कामे पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाली नाही म्हणून थांबविण्यात आली होती. आता मात्र परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास नाशिक पर्यटन विभागाचे महेश बागुल यांनी व्यक्त केला.या आठ तीर्थक्षेत्रांचा होणार विकासगुजरातमधील सोरटी सोमनाथ, जम्मू-काश्मीरमधील हजरतबल, झारखंडमधील देवघर, मध्य प्रदेशातील उज्जैन, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, उत्तर प्रदेशातील अयोध्या, पश्चिम बंगालमधील बेलूर ही आठ तीर्थक्षेत्र प्रायोगिक विकासकामांसाठी निवडण्यात आली आहेत. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर