शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नाशिकसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:38 IST

त्र्यंबकेश्वर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे -विल्होळी हा प्रमुख जिल्हा मार्ग तसेच वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-महिरावणी ते गिरणारे-वाघेरा हा राज्य महामार्ग यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देदहा कोटी मंजूर : रस्त्यांचे लवकरच नूतनीकरण

त्र्यंबकेश्वर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे -विल्होळी हा प्रमुख जिल्हा मार्ग तसेच वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-महिरावणी ते गिरणारे-वाघेरा हा राज्य महामार्ग यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे-विल्होळी ह्या प्रमुख जिल्हा मार्गासाठी चार कोटी ८७ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यानुसार या रस्त्याचे लवकरच नूतनीकरण होणार आहे. तसेच वाडीवऱ्हे, दहेगाव, जातेगाव, महिरावणी ते गिरणारे, वाघेरा हा राज्य महामार्गही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. याही रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल नाशिकसह इतर बाजारपेठांमध्ये वाहतूक करणेकामी सुलभ व्हावे तसेच अंजनेरीच्या गडावर येणाऱ्या भाविकांना थेट गडावर येणे सोपे व्हावे यासाठी खासदार गोडसे यांनी अंजेनरी-मुळेगाव रस्त्यासाठी केंद्राकडे मागणी केली होती. गडकरी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार विशेष रस्ता कामांसाठी तब्बल १४ कोटी १३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमाल इतरत्र वाहतूक करण्यासाठी जलद रस्ते उपलब्ध होणार असून, तसेच या रस्त्याच्या नूतनीकरणामुळे पर्यटन विकासाला अधिकाधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा