शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने फळभाज्या कोसळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:19 IST

फळभाज्यांचे दर घसरले असून, भाजीपाल्याचा उत्पादन व वाहतुकीचा खर्चदेखील सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ...

फळभाज्यांचे दर घसरले असून, भाजीपाल्याचा उत्पादन व वाहतुकीचा खर्चदेखील सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.

बाजार समितीत भेंडी, वांगी, दोडका, भोपळा, शिमला मिरची, टोमॅटो यासारख्या सर्व फळभाज्या विक्रीसाठी दाखल होत आहेत, मात्र बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या बाजारभावात शेतमाल विक्री करावा लागत आहे. बाजार समितीत विक्रीला आलेल्या शिमला मिरचीला पाच रुपये, भोपळा दोन, दोडका पाच, वांगी सहा व भेंडी सात रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत आहे. फळभाज्या स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवला आहे तर काही शेतकरी थेट मुंबई, मुंबई उपनगरात शेतमाल विक्रीसाठी नेत असल्याने उठाव कमी झाला आहे. परिणामी स्थानिक व्यापारीदेखील शेतमाल खरेदी करत नसल्याने बाजार घसरले असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.