शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

जिल्ह्यात १५ आॅगस्टपासून संगणकीय सातबारा वितरण्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:18 IST

नाशिक : प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली आहे.राज्य सरकारने संगणकीय सातबारा देण्यासाठी वर्धा व नाशिकची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली होती, त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून ...

नाशिक : प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली आहे.राज्य सरकारने संगणकीय सातबारा देण्यासाठी वर्धा व नाशिकची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली होती, त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून हस्तलिखित सातबारा उताºयाचे संगणकीयकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्याबरोबरच इंटरनेटची जोडणीही देण्यात आली, तथापि, अतिशय किचकट असलेल्या या कामात वेळोवेळी तांत्रिक दोषही निर्माण झाल्याने हे काम वर्षानुवर्षे रखडले. अखेर जिल्ह्यातील १२ लाख १८ हजार १७३ खातेदारांपैकी ११ लाख ८३ हजार ३३२ खातेदारांचे संगणकीकरण करण्यात आले असून, त्याचे प्रमाण ९७.१४ टक्केइतके आहे. अद्याप ३४ हजार ८४१ खातेदारांचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील पेठ तालुक्यात शंभर टक्के संगणकीकरण झाले असून, नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच ८९.८० टक्के इतके काम झाले आहे. नाशिक शहरात दोन लाख १० हजार ४७३ खातेदार असून, त्यापैकी एक लाख ८९ हजार ००६ इतक्या खातेदारांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दहा दिवसांत अपूर्ण काम पूर्ण करून १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक येथे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते संगणकीय सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.जिल्ह्यात ज्या ठिकाणी हस्तलिखित व संगणकीय सातबारा उतारा तंतोतंत जुळले अशा ठिकाणी १ जानेवारी २०१७ पासूनच सातबारा उतारे आॅनलाइन पद्धतीने व डिजिटल सिग्नेचर वापरून नागरिकांना देण्यात येत असून, आजपावेतो ६,४८४ इतके उतारे वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. सातबारा उताºयासाठी तलाठी व मंडळ अधिकाºयाच्या कार्यालयाच्या चकरा टाळण्यासाठी नागरिकांनी ‘आपलं सरकार’ या पोर्टलचा वापर करून डिजिटल स्वाक्षरीचे साताबारा उतारा प्राप्त करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.