शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

धोकादायक वळणावर वारंवार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:15 IST

एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.शिंदेगावापासून ओझरच्या दहावा मैलपर्यंत रिंगरोड बनविण्यात आला आहे. पुणे, औरंगाबाद व आग्रा अशा तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता हिंगणवेढे गावाजवळून जातो. लाखलगावकडून येताना हिंगणवेढे गावाच्या प्रवेशद्वाराजवळच या मार्गावर ९० अंशांचे वळण आहे. या वळणाच्या दोन्ही बाजूने असलेले गतिरोधक नादुरु स्त झाले आहेत. तसेच संरक्षक कथड्याचे लोखंडी पाइपही तुटलेले आहेत. रिफ्लेक्टर्स व दिशादर्शक फलकही नाही. त्यामुळे रात्री-बेरात्री वाहनचालकांची दिशाभूल होऊन वाहने सरळ संरक्षक कथड्यावर आदळून अपघात होतात. या रस्त्याच्या लगतच नागरी वसाहत आहे. अनेकदा वळणाचा अंदाज न आल्याने वेगाने येणारी वाहने सरळ हिंगणवेढे गावाच्या प्रवेशद्वारातून गावात शिरतात. रस्त्यालगत लावलेले लोखंडी कथडेही वारंवार होणाºया अपघातांमुळे तुटून पडले आहेत.रस्त्यालगतच्या घरांनाही अनेकदा नुकसान पोहोचले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित हा रस्ता येत असल्याने त्याची डागडुजी होऊन दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावेत व तुटलेले कठडेही दुरु स्त करावेत. हे काम तातडीने झाले नाही तर आंदोलन करून रास्ता रोको करावा लागेल, असा इशारा हिंगणवेढेचे उपसरपंच वाल्मीक धात्रक, विक्र म राजाराम धात्रक यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे--------हिंगणवेढे गावाजवळून रिंगरोड जातो. वळणाचा रस्ता असल्याने वेगाने येणारी वाहने नियंत्रित झाली नाही तर सरळ गावात शिरतात. त्यामुळे रस्त्यालगतच्या घरांचेही नुकसान झाले आहे. या ठिकाणी त्वरित दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावेत.- साहेबराव धात्रक, रहिवासी-------------गावाजवळून गेलेल्या महामार्गावर गावाजवळच मोठे वळण आहे. त्याच्या दोन्ही बाजूंचे गतिरोधक खराब झाले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने वाहने संरक्षक कठड्यावर धडकून अपघात होतात. त्यामुळे संरक्षक कठडेही तुटले आहेत.- गंगाधर धात्रक, रहिवासी

टॅग्स :Nashikनाशिक