शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

धोकादायक वळणावर वारंवार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:15 IST

एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.शिंदेगावापासून ओझरच्या दहावा मैलपर्यंत रिंगरोड बनविण्यात आला आहे. पुणे, औरंगाबाद व आग्रा अशा तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता हिंगणवेढे गावाजवळून जातो. लाखलगावकडून येताना हिंगणवेढे गावाच्या प्रवेशद्वाराजवळच या मार्गावर ९० अंशांचे वळण आहे. या वळणाच्या दोन्ही बाजूने असलेले गतिरोधक नादुरु स्त झाले आहेत. तसेच संरक्षक कथड्याचे लोखंडी पाइपही तुटलेले आहेत. रिफ्लेक्टर्स व दिशादर्शक फलकही नाही. त्यामुळे रात्री-बेरात्री वाहनचालकांची दिशाभूल होऊन वाहने सरळ संरक्षक कथड्यावर आदळून अपघात होतात. या रस्त्याच्या लगतच नागरी वसाहत आहे. अनेकदा वळणाचा अंदाज न आल्याने वेगाने येणारी वाहने सरळ हिंगणवेढे गावाच्या प्रवेशद्वारातून गावात शिरतात. रस्त्यालगत लावलेले लोखंडी कथडेही वारंवार होणाºया अपघातांमुळे तुटून पडले आहेत.रस्त्यालगतच्या घरांनाही अनेकदा नुकसान पोहोचले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित हा रस्ता येत असल्याने त्याची डागडुजी होऊन दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावेत व तुटलेले कठडेही दुरु स्त करावेत. हे काम तातडीने झाले नाही तर आंदोलन करून रास्ता रोको करावा लागेल, असा इशारा हिंगणवेढेचे उपसरपंच वाल्मीक धात्रक, विक्र म राजाराम धात्रक यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे--------हिंगणवेढे गावाजवळून रिंगरोड जातो. वळणाचा रस्ता असल्याने वेगाने येणारी वाहने नियंत्रित झाली नाही तर सरळ गावात शिरतात. त्यामुळे रस्त्यालगतच्या घरांचेही नुकसान झाले आहे. या ठिकाणी त्वरित दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावेत.- साहेबराव धात्रक, रहिवासी-------------गावाजवळून गेलेल्या महामार्गावर गावाजवळच मोठे वळण आहे. त्याच्या दोन्ही बाजूंचे गतिरोधक खराब झाले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने वाहने संरक्षक कठड्यावर धडकून अपघात होतात. त्यामुळे संरक्षक कठडेही तुटले आहेत.- गंगाधर धात्रक, रहिवासी

टॅग्स :Nashikनाशिक