शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

स्वातंत्र्याची क्रांतिज्योत पेटवणारा ‘स्वातंत्र्यशाहीर’ विस्मृतीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:26 IST

नाशिक : स्वातंत्र्याची क्रांतिज्योत पेटवणारे ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे अजरामर काव्य लिहिल्याने ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून गौरवले गेलेल्या कवी गोविंद ...

नाशिक : स्वातंत्र्याची क्रांतिज्योत पेटवणारे ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे अजरामर काव्य लिहिल्याने ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून गौरवले गेलेल्या कवी गोविंद यांच्याबाबतच्या बहुतांश स्मृती आता नाशिककरांना धुसर झाल्या आहेत. ‘मित्रमेळा’ ते ‘अभिनव भारत’ आणि त्यानंतर आजन्म सावरकर बंधूंच्या आणि परिवाराच्या सुखदु:खात साथ दिलेल्या या कवीचा स्मृतीदिनच नव्हे तर त्यांचे देशभक्तीपर कार्यदेखील विस्मृतीत गेले आहे.

नाशिकला सामान्य कुटुंबात जन्मलेले कवी गोविंद त्र्यंबक दरेकर यांच्यात बालपणापासूनच कमालीची काव्यप्रतिभा होती. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आल्याने त्यांचे लौकिक शिक्षणही झाले नव्हते. कविता मात्र बालपणापासून करीत होते. आरंभी ते लावण्या लिहीत. ‘हौशिने करा मसि गेंद गेंद । घडवा हो बाजुबंद ।’ ही लावणी म्हणजे त्यांची पहिली उपलब्ध कविता मानली जाते. मात्र, नाशिकमध्ये सावरकर बंधू रहायला आल्यानंतर कवी गोविंदांच्या प्रतिभेला जणू परीसस्पर्श झाला. १९०० या वर्षी नाशिकमधील ‘मित्रमेळा’ च्या निमित्ताने स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची जणू दिशाच गवसली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी, नरवीर तानाजी, समर्थ रामदास यासारख्या ऐतिहासिक पराक्रमी पुरुषांवर आणि संतांवर लिहिलेल्या कविता तसेच ‘स्वातंत्र्याचा पाळणा’, ‘स्वातंत्र्यलक्ष्मीस्तव’, ‘भारतप्रशस्ति’ ह्यांसारख्या कविता नाशिकमधील क्रांतिकारकांची प्रेरणगीते ठरली. या गीतांमुळे ते नाशिकसह राज्यभरात त्या काळी ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून प्रख्यात झाले होते. त्यामुळेच देशभक्तीने भारलेल्या त्यांच्या अनेक कविता ब्रिटिश सरकारने जप्त केल्या होत्या. त्याशिवाय 'कारागृहाचे भय काय त्याला? , 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या कितीतरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले होते. कवी गोविंद यांची कविता या नावाने त्यांच्या ५२ कविता संग्रहित झाल्या होत्या.

इन्फो

संकटकाळी धावले मदतीला

सावरकर बंधूंना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही कुटुंबांना ब्रिटिश सरकारने घराबाहेर काढले. ब्रिटिशांच्या धाकामुळे जेव्हा कुणीच त्यांना मदत करायला धजावत नव्हते. त्यावेळी गंगेवर रहावे लागलेल्या सावरकरांच्या कुटुंबांचा चरितार्थ चालावा म्हणून ते काळाराम मंदिरात रामायण, महाभारत कथा सांगून त्यातून मिळणारे धान्य आणून मातांकडे सुपूर्द करीत होते.

फोटो

२७कवी गोविंद