शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वातंत्र्याची क्रांतिज्योत पेटवणारा ‘स्वातंत्र्यशाहीर’ विस्मृतीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:26 IST

नाशिक : स्वातंत्र्याची क्रांतिज्योत पेटवणारे ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे अजरामर काव्य लिहिल्याने ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून गौरवले गेलेल्या कवी गोविंद ...

नाशिक : स्वातंत्र्याची क्रांतिज्योत पेटवणारे ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे अजरामर काव्य लिहिल्याने ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून गौरवले गेलेल्या कवी गोविंद यांच्याबाबतच्या बहुतांश स्मृती आता नाशिककरांना धुसर झाल्या आहेत. ‘मित्रमेळा’ ते ‘अभिनव भारत’ आणि त्यानंतर आजन्म सावरकर बंधूंच्या आणि परिवाराच्या सुखदु:खात साथ दिलेल्या या कवीचा स्मृतीदिनच नव्हे तर त्यांचे देशभक्तीपर कार्यदेखील विस्मृतीत गेले आहे.

नाशिकला सामान्य कुटुंबात जन्मलेले कवी गोविंद त्र्यंबक दरेकर यांच्यात बालपणापासूनच कमालीची काव्यप्रतिभा होती. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आल्याने त्यांचे लौकिक शिक्षणही झाले नव्हते. कविता मात्र बालपणापासून करीत होते. आरंभी ते लावण्या लिहीत. ‘हौशिने करा मसि गेंद गेंद । घडवा हो बाजुबंद ।’ ही लावणी म्हणजे त्यांची पहिली उपलब्ध कविता मानली जाते. मात्र, नाशिकमध्ये सावरकर बंधू रहायला आल्यानंतर कवी गोविंदांच्या प्रतिभेला जणू परीसस्पर्श झाला. १९०० या वर्षी नाशिकमधील ‘मित्रमेळा’ च्या निमित्ताने स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची जणू दिशाच गवसली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी, नरवीर तानाजी, समर्थ रामदास यासारख्या ऐतिहासिक पराक्रमी पुरुषांवर आणि संतांवर लिहिलेल्या कविता तसेच ‘स्वातंत्र्याचा पाळणा’, ‘स्वातंत्र्यलक्ष्मीस्तव’, ‘भारतप्रशस्ति’ ह्यांसारख्या कविता नाशिकमधील क्रांतिकारकांची प्रेरणगीते ठरली. या गीतांमुळे ते नाशिकसह राज्यभरात त्या काळी ‘स्वातंत्र्यशाहीर’ म्हणून प्रख्यात झाले होते. त्यामुळेच देशभक्तीने भारलेल्या त्यांच्या अनेक कविता ब्रिटिश सरकारने जप्त केल्या होत्या. त्याशिवाय 'कारागृहाचे भय काय त्याला? , 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या कितीतरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले होते. कवी गोविंद यांची कविता या नावाने त्यांच्या ५२ कविता संग्रहित झाल्या होत्या.

इन्फो

संकटकाळी धावले मदतीला

सावरकर बंधूंना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही कुटुंबांना ब्रिटिश सरकारने घराबाहेर काढले. ब्रिटिशांच्या धाकामुळे जेव्हा कुणीच त्यांना मदत करायला धजावत नव्हते. त्यावेळी गंगेवर रहावे लागलेल्या सावरकरांच्या कुटुंबांचा चरितार्थ चालावा म्हणून ते काळाराम मंदिरात रामायण, महाभारत कथा सांगून त्यातून मिळणारे धान्य आणून मातांकडे सुपूर्द करीत होते.

फोटो

२७कवी गोविंद