शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

स्वातंत्र्य सैनिक ओंकार लिंगायत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:15 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते ओंकारआप्पा गोविंदआप्पा लिंगायत (९५) यांचे मंगळवारी (दि. २९) दुपारी वृद्धापकाळाने नाशिक मुक्कामी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. बुधवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता मालेगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

संगमेश्वर : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते ओंकारआप्पा गोविंदआप्पा लिंगायत (९५) यांचे मंगळवारी (दि. २९) दुपारी वृद्धापकाळाने नाशिक मुक्कामी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. बुधवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता मालेगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनात या. ना. जाधव यांच्या नेतृत्वाखालील ओंकारआप्पा लिंगायत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेत १९४३ साली पुण्याच्या आगाखान पॅलेस मोर्चात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना इंग्रज सरकारने अटक केल्याने येरवडा तुरुंगात सहा महिने सश्रम कारावास भोगला होता. टेलिफोनच्या तारा तोडणे, पोस्ट आॅफिस लुटणे आदींच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. साथी शिवाजी पाटील, विठ्ठलराव काळे आदी समाजवादी कार्यकर्त्यांसमवेत ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. राष्टÑ सेवा दलाच्या कार्यात सहभाग घेऊन या चळवळीच्या वाढीसाठी त्यांनी योगदान दिले होते. संगमेश्वरातील महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेची उभारणी करण्यात या. ना. जाधव, माधवराव वडगे, डॉ. नवलराय शहा, निहाल अहमद आदींसमवेत त्यांनी कार्य केले.  मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मालेगाव मर्चंट्स बँकेचे दोन वेळा संचालक व चेअरमन, नगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. साने गुरुजी परिवार, साने गुरुजी रुग्णालय, व्यापारी संघटना, लोकसमितीच्या माध्यमातून सदैव कार्यरत असत. अनेक वर्ष त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे शासकीय मानधन घेतले नाही. नंतरच्या काळात सामाजिक कार्यासाठी ते मानधन वाटून देत असत. शहरातील सामाजिक, शैक्षणिक संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यात त्यांचा पुढाकार असायचा. भारताचे राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांना दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे ओंकारआप्पा लिंगायत हे शेवटपर्यंत खादीची वस्त्रे परिधान करीत असत. अत्यंत कडक शिस्तीचे व स्पष्ट वक्तेपणासाठी ते प्रसिद्ध होते.