शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मालेगावी तहसीलतर्फे मोफत धान्य वाटप नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:28 IST

स्वस्त धान्य दुकानात अंत्योदयसाठी ३५ किलो धान्य आणि १ किलो साखर प्रतिशिधापत्रिका तर प्राधान्य कुटुंबधारकाला मंजूर सदस्य (युनिट)नुसार प्रतिसदस्य गहू ३ किलो प्रतिकिलो २ रुपये, तांदूळ २ किलो हे प्रतिकिलो ३ रुपये दराने केंद्र सरकार कडून वरील दोन्ही योजनेतील लाभार्थी करिता अतिरिक्त ५ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनमध्ये दिलासा : अतिरिक्त पाच किलो तांदूळ मिळणार

मालेगाव : शहरात स्वस्त धान्य दुकानात अंत्योदयसाठी ३५ किलो धान्य आणि १ किलो साखरप्रतिशिधापत्रिका तर प्राधान्य कुटुंबधारकाला मंजूर सदस्य (युनिट)नुसार प्रतिसदस्य गहू ३ किलो प्रतिकिलो २ रुपये, तांदूळ २ किलो हे प्रतिकिलो ३ रुपये दराने केंद्र सरकार कडून वरील दोन्ही योजनेतील लाभार्थी करिता अतिरिक्त ५ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अडचणी असल्यास धान्य वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केले आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाउन झालेल्या जनतेला राज्यातील सरकारने दिलासा देण्याच प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. तसेच केंद्र सरकारकडून प्रत्येक पात्र लाभार्थीस ५ किलो तांदूळ देण्यात येणार असून, ते धान्य अजून उपलब्ध झालेले नाही. लवकरच ते मालेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्राच्या वतीने देण्यात येणारे ५ किलो तांदूळ आणि आताचे स्वस्त धान्य दुकानावर दिले जाणारे धान्य याचे वाटप हे वेगवेगळे होणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून, या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाउनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर दर महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे. तसेच नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानावर गर्दी करू नये सोशल डिस्टेन्सचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. त्यासाठी रेशन दुकाने हे दररोज चालू ठेवण्याचे आदेश तहसीलदार राजपूत यांच्याकडून देण्यात आले आहेत. शिवाय पात्र लाभार्थी नसले किंवा रेशनकार्ड नसले तरी लॉकडाउनमध्ये अन्नधान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडून करण्यात आले आहे. रेशन दुकानावरील लाभार्थी यादी सामाजिक संस्थांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शासकीय लाभार्थीव्यतिरिक्त उरलेले धान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनदेखील सामाजिक संस्थांना करण्यात आले आहे.शासनाने तीन महिन्याचे धान्य एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता; पण त्यात काही अडचणी येत असल्याने ते धान्य वाटप दर महिन्याला करण्यात येणार आहे. नागरिकांनी गोंधळून जाण्याचे काही कारण नाही. सध्या स्वस्त धान्य दुकानावर दिले जाणारे धान्य हे अंत्योदयधारकांना ३५ किलो धान्य आणि १ किलो साखर प्रतिएकास कुटुंबशिधापत्रिकाधारक मंजूर सदस्य ( युनिट ) साठी प्रतिसदस्य ३ किलो गहू तर २ किलो तांदूळ असे युनिटमधील सदस्यांना प्रतिगहू २ तर तांदूळ ३ रुपयाच्या दराने मिळेल. पूर्वी असलेल्या मान्य यादीनुसार सर्वांना दर महिन्याला हे धान्य वाटप होणार असून चढ्या दराने अथवा दुकानदाराकडून काही गैरप्रकार दिसून आल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल.मालेगाव धान्य वितरण अधिकारी शहर यांच्या कक्षेत एकूण अंत्योदयचे -१४८०० , प्राधान्य सदस्य संख्या - १,५०,००० , तर मालेगाव तालुक्यातील अंत्योदयचे -११८०० , प्राधान्य सदस्य संख्या - २,६३,२७० असून दोघे मिळून ३२४ स्वस्त धान्य दुकाने आहेत. दर महिन्यात ज्या पद्धतीने वाटप करण्यात येत होते तसेच वाटप करण्यात येणार असून, केंद्र सरकारकडून अतिरिक्त ५ किलो तांदूळ वाटप करण्यात येणार असून, ते नि:शुल्क असणार आहे. कोणीहीया ५ किलो धान्याचे पैसे घेतल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी दक्षता समिती असून, त्याद्वारे त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न