शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी तहसीलतर्फे मोफत धान्य वाटप नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:28 IST

स्वस्त धान्य दुकानात अंत्योदयसाठी ३५ किलो धान्य आणि १ किलो साखर प्रतिशिधापत्रिका तर प्राधान्य कुटुंबधारकाला मंजूर सदस्य (युनिट)नुसार प्रतिसदस्य गहू ३ किलो प्रतिकिलो २ रुपये, तांदूळ २ किलो हे प्रतिकिलो ३ रुपये दराने केंद्र सरकार कडून वरील दोन्ही योजनेतील लाभार्थी करिता अतिरिक्त ५ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनमध्ये दिलासा : अतिरिक्त पाच किलो तांदूळ मिळणार

मालेगाव : शहरात स्वस्त धान्य दुकानात अंत्योदयसाठी ३५ किलो धान्य आणि १ किलो साखरप्रतिशिधापत्रिका तर प्राधान्य कुटुंबधारकाला मंजूर सदस्य (युनिट)नुसार प्रतिसदस्य गहू ३ किलो प्रतिकिलो २ रुपये, तांदूळ २ किलो हे प्रतिकिलो ३ रुपये दराने केंद्र सरकार कडून वरील दोन्ही योजनेतील लाभार्थी करिता अतिरिक्त ५ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अडचणी असल्यास धान्य वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केले आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाउन झालेल्या जनतेला राज्यातील सरकारने दिलासा देण्याच प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. तसेच केंद्र सरकारकडून प्रत्येक पात्र लाभार्थीस ५ किलो तांदूळ देण्यात येणार असून, ते धान्य अजून उपलब्ध झालेले नाही. लवकरच ते मालेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्राच्या वतीने देण्यात येणारे ५ किलो तांदूळ आणि आताचे स्वस्त धान्य दुकानावर दिले जाणारे धान्य याचे वाटप हे वेगवेगळे होणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून, या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाउनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर दर महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे. तसेच नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानावर गर्दी करू नये सोशल डिस्टेन्सचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. त्यासाठी रेशन दुकाने हे दररोज चालू ठेवण्याचे आदेश तहसीलदार राजपूत यांच्याकडून देण्यात आले आहेत. शिवाय पात्र लाभार्थी नसले किंवा रेशनकार्ड नसले तरी लॉकडाउनमध्ये अन्नधान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडून करण्यात आले आहे. रेशन दुकानावरील लाभार्थी यादी सामाजिक संस्थांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शासकीय लाभार्थीव्यतिरिक्त उरलेले धान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनदेखील सामाजिक संस्थांना करण्यात आले आहे.शासनाने तीन महिन्याचे धान्य एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता; पण त्यात काही अडचणी येत असल्याने ते धान्य वाटप दर महिन्याला करण्यात येणार आहे. नागरिकांनी गोंधळून जाण्याचे काही कारण नाही. सध्या स्वस्त धान्य दुकानावर दिले जाणारे धान्य हे अंत्योदयधारकांना ३५ किलो धान्य आणि १ किलो साखर प्रतिएकास कुटुंबशिधापत्रिकाधारक मंजूर सदस्य ( युनिट ) साठी प्रतिसदस्य ३ किलो गहू तर २ किलो तांदूळ असे युनिटमधील सदस्यांना प्रतिगहू २ तर तांदूळ ३ रुपयाच्या दराने मिळेल. पूर्वी असलेल्या मान्य यादीनुसार सर्वांना दर महिन्याला हे धान्य वाटप होणार असून चढ्या दराने अथवा दुकानदाराकडून काही गैरप्रकार दिसून आल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल.मालेगाव धान्य वितरण अधिकारी शहर यांच्या कक्षेत एकूण अंत्योदयचे -१४८०० , प्राधान्य सदस्य संख्या - १,५०,००० , तर मालेगाव तालुक्यातील अंत्योदयचे -११८०० , प्राधान्य सदस्य संख्या - २,६३,२७० असून दोघे मिळून ३२४ स्वस्त धान्य दुकाने आहेत. दर महिन्यात ज्या पद्धतीने वाटप करण्यात येत होते तसेच वाटप करण्यात येणार असून, केंद्र सरकारकडून अतिरिक्त ५ किलो तांदूळ वाटप करण्यात येणार असून, ते नि:शुल्क असणार आहे. कोणीहीया ५ किलो धान्याचे पैसे घेतल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी दक्षता समिती असून, त्याद्वारे त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न