शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

नाटकातून बंधुत्वाचा संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2015 00:08 IST

दत्ता नागपुरे : बालनाट्य स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

नाशिक : नाटकात जातपात-धर्म-पंथाला महत्त्व न देता केवळ कलेवर लक्ष केंद्रित केले जात असल्याने त्यातून बंधुत्वाचा संस्कार रुजतो. त्यामुळे चांगला माणूस तयार होण्यासाठी बालनाट्य चळवळ महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता नागपुरे यांनी केले. सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने तेराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन आज परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाले, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. येत्या १२ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून, त्यात एकूण ३४ नाटके सादर होणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम होते. परीक्षक रमाकांत मुळे (औरंगाबाद), कैलास पप्पूलवाड (नांदेड), नविनी कुलकर्णी (मुंबई), स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नागपुरे म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून व्यक्त केलेल्या भावनेचा प्रत्यय नाटकातून येतो. विश्वबंधुत्वाचा प्रसार करण्याची आज सर्वाधिक गरज असून, त्यासाठी नाटक महत्त्वाचे वाटते. बालनाट्यातून मुलांवर होणाऱ्या संस्कारातून चांगले अभिनेते, चांगली माणसे घडतात. मुलांना नाटकांचा करिअरमध्येही उपयोग होतो. त्यामुळे बालनाट्याची चळवळ सुरू राहायला हवी. रवींद्र कदम यांनी सांगितले की, मुलांनी केवळ पुस्तकी किडे न राहता, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरतात. गेल्या वर्षी नाशिकच्या बालनाट्याने राज्यात यश मिळवल्याने यंदाही त्याची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजेश शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)