शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

चौदा वर्षांनंतर भाबडबारी, शेलबारी टोलमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:24 IST

नितीन बोरसे । सटाणा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या शिर्डी-साक्री मार्गावरील भाबडबारी व शिरवाडे टोलनाका यांच्या वसुलीची ...

ठळक मुद्देशिर्डी-साक्री महामार्ग : वसुलीची मुदत संपुष्टात आल्याने चालकांना दिलासा

नितीन बोरसे ।सटाणा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या शिर्डी-साक्री मार्गावरील भाबडबारी व शिरवाडे टोलनाका यांच्या वसुलीची मुदत शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्रीपासून संपुष्टात आल्याने महामार्ग तब्बल १४ वर्षांनंतर टोलमुक्त झाला आहे. सार्वजनिक बांधकाम टोलवसुलीची काढलेली अधिसूचना रद्द केली आहे. मार्गाच्या कॉँक्रिटीकरणासह दुपदरीकरणही होणार असून, त्यामुळे कोंडीही मोकळी होण्यास मदत होणार आहे.पंधरा वर्षांपूर्वी दहीवेल-सोग्रस या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. गुजरात राज्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्यामुळे जड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. त्यामुळे २००६-०७ मध्ये ‘बांधा आणि वापरा’ तत्त्वावर दहीवेल ते सोग्रस अशा ८६.९०० किलोमीटर रस्त्याचे काम करून भाबडबारी आणि शेलबारी नजीकच्या शिरवाडे अशा दोन ठिकाणी टोल उभारण्यात आले होते. त्या दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टोल वसुलीसाठी अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर तब्बल चौदा वर्षांनंतर शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्री १२ वाजेपासून सदर महामार्ग टोलमुक्त झाला आहे. बांधकाम विभागाने त्यासंबंधीची अधिसूचना रद्द केली आहे. या मार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून, गेल्या ३ जानेवारी २०१७ रोजी दिल्लीच्या भूपृष्ठवाहतूक महामार्ग मंत्रालयाने शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी म्हणून या मार्गाची घोषणा केली होती.७ मीटरचा रस्ता होणार आता १० मीटरसोग्रस ते दहीवेल ह्या ८६.९०० किलोमीटरच्या रस्त्याची रु ंदी ७ मीटर इतकी आहे. या मार्गावर वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेक निष्पाप बळी गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी पुढे आली होती. शासनाने याची दखल घेऊन रस्ता विकासासाठी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. सुरुवातीला या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर रस्त्याचे चौपदरीकरणचे काम प्रस्तावित करण्यात आले होते, मात्र या रस्त्याची निविदा दुपदरीकरणाची असल्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार आहे. हा रस्ता आता ७ मीटरऐवजी १० मीटर रुंदीचा होणार असून, संपूर्ण रस्ता काँक्र ीटचा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळनेर ते सटाण्याच्या इदगाह मैदानापर्यंत तयार करण्यात येणार आहे.७ मीटरचा रस्ता होणार आता १० मीटरसोग्रस ते दहीवेल ह्या ८६.९०० किलोमीटरच्या रस्त्याची रु ंदी ७ मीटर इतकी आहे. या मार्गावर वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेक निष्पाप बळी गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी पुढे आली होती. शासनाने हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर रस्त्याचे चौपदरीकरणचे काम प्रस्तावित करण्यात आले होते, मात्र या रस्त्याची निविदा दुपदरीकरणाची असल्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार आहे. हा रस्ता आता ७ मीटरऐवजी १० मीटर रुंदीचा होणार असून, संपूर्ण रस्ता काँक्र ीटचा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळनेर ते सटाण्याच्या इदगाह मैदानापर्यंत तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाroad transportरस्ते वाहतूक