शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चौदा वर्षांनंतर भाबडबारी, शेलबारी टोलमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:24 IST

नितीन बोरसे । सटाणा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या शिर्डी-साक्री मार्गावरील भाबडबारी व शिरवाडे टोलनाका यांच्या वसुलीची ...

ठळक मुद्देशिर्डी-साक्री महामार्ग : वसुलीची मुदत संपुष्टात आल्याने चालकांना दिलासा

नितीन बोरसे ।सटाणा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या शिर्डी-साक्री मार्गावरील भाबडबारी व शिरवाडे टोलनाका यांच्या वसुलीची मुदत शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्रीपासून संपुष्टात आल्याने महामार्ग तब्बल १४ वर्षांनंतर टोलमुक्त झाला आहे. सार्वजनिक बांधकाम टोलवसुलीची काढलेली अधिसूचना रद्द केली आहे. मार्गाच्या कॉँक्रिटीकरणासह दुपदरीकरणही होणार असून, त्यामुळे कोंडीही मोकळी होण्यास मदत होणार आहे.पंधरा वर्षांपूर्वी दहीवेल-सोग्रस या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. गुजरात राज्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्यामुळे जड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. त्यामुळे २००६-०७ मध्ये ‘बांधा आणि वापरा’ तत्त्वावर दहीवेल ते सोग्रस अशा ८६.९०० किलोमीटर रस्त्याचे काम करून भाबडबारी आणि शेलबारी नजीकच्या शिरवाडे अशा दोन ठिकाणी टोल उभारण्यात आले होते. त्या दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टोल वसुलीसाठी अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर तब्बल चौदा वर्षांनंतर शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्री १२ वाजेपासून सदर महामार्ग टोलमुक्त झाला आहे. बांधकाम विभागाने त्यासंबंधीची अधिसूचना रद्द केली आहे. या मार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून, गेल्या ३ जानेवारी २०१७ रोजी दिल्लीच्या भूपृष्ठवाहतूक महामार्ग मंत्रालयाने शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी म्हणून या मार्गाची घोषणा केली होती.७ मीटरचा रस्ता होणार आता १० मीटरसोग्रस ते दहीवेल ह्या ८६.९०० किलोमीटरच्या रस्त्याची रु ंदी ७ मीटर इतकी आहे. या मार्गावर वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेक निष्पाप बळी गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी पुढे आली होती. शासनाने याची दखल घेऊन रस्ता विकासासाठी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. सुरुवातीला या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर रस्त्याचे चौपदरीकरणचे काम प्रस्तावित करण्यात आले होते, मात्र या रस्त्याची निविदा दुपदरीकरणाची असल्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार आहे. हा रस्ता आता ७ मीटरऐवजी १० मीटर रुंदीचा होणार असून, संपूर्ण रस्ता काँक्र ीटचा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळनेर ते सटाण्याच्या इदगाह मैदानापर्यंत तयार करण्यात येणार आहे.७ मीटरचा रस्ता होणार आता १० मीटरसोग्रस ते दहीवेल ह्या ८६.९०० किलोमीटरच्या रस्त्याची रु ंदी ७ मीटर इतकी आहे. या मार्गावर वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेक निष्पाप बळी गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी पुढे आली होती. शासनाने हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर रस्त्याचे चौपदरीकरणचे काम प्रस्तावित करण्यात आले होते, मात्र या रस्त्याची निविदा दुपदरीकरणाची असल्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार आहे. हा रस्ता आता ७ मीटरऐवजी १० मीटर रुंदीचा होणार असून, संपूर्ण रस्ता काँक्र ीटचा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळनेर ते सटाण्याच्या इदगाह मैदानापर्यंत तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाroad transportरस्ते वाहतूक