शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

चौदा हजार गावांत दुष्काळ!

By admin | Updated: October 16, 2015 23:21 IST

नाशिक : १५७७ गावांचा समावेश

नाशिक : यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खरिपाचे पिके हातची जाऊन रब्बीलाही धोका निर्माण झाल्याने जिल्ह्णातील १५७७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात नाशिक, इगतपुरी व त्र्यंबक या तीन तालुक्यांना मात्र त्यातून वगळण्यात येऊन उर्वरित बारा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावातील जनतेला दिलासा मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात महसूल विभागाने खरीप हंगामातील पिकांची नजर पैसेवारी केली असता तेव्हाच संपूर्ण खरीप शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याचे स्पष्ट झाले, परंतु अशाही परिस्थितीत सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. जिल्ह्णातील एकूण १९६० गावांपैकी खरीप पिके घेणारी १६७७ गावे असून, २८३ गावे रब्बी पिकांची आहेत. नजर पाहणीतून १३६८ गावातील खरीप पिकांची अवस्था ५० पैशांहून कमी असून, रब्बीचे २०९ गावांमधील पिकांची परिस्थिती ५० पैशांपेक्षा कमी आहे अशा प्रकारे १५७७ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र नाशिक, इगतपुरी व त्र्यंबक या तीन तालुक्यांतील खरीप पिके घेणाऱ्या गावांमधील गावांमधील परिस्थिती समाधानकारक असल्याने त्यांना यातून वगळण्यात आले आहे.