शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

चार वर्षांतील सरकारच्या अनास्थेचा बळी : कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:36 IST

सिन्नरसारख्या दुष्काळी भागात एसईझेड होणे ही खूप मोठी घटना होती. सर्वपायाभूत सुविधा असलेल्या या तालुक्यातील दहा हजार लोकांना मिळेल अशा क्षमतेचा प्रकल्प होता. मात्र चार वर्षांत सरकार किंवा उद्योगमंत्र्यांनी त्याकडे लक्ष पुरवले नाही.

नाशिक : सिन्नरसारख्या दुष्काळी भागात एसईझेड होणे ही खूप मोठी घटना होती. सर्वपायाभूत सुविधा असलेल्या या तालुक्यातील दहा हजार लोकांना मिळेल अशा क्षमतेचा प्रकल्प होता. मात्र चार वर्षांत सरकार किंवा उद्योगमंत्र्यांनी त्याकडे लक्ष पुरवले नाही. त्यामुळे हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही, असे मत सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.  गुळवंच आणि मुसळगाव येथील इंडीया बुल्स कंपनीचा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर या प्रकल्पाला मदत करण्यासाठी कोकाटे यांनी प्रयत्न केले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या सध्याच्या अवस्थेबाबत त्यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हा निव्वळ सरकारी अनास्थेचा बळी असल्याची भावना व्यक्त केली. सिन्नर तालुक्यात पायाभूत सुविधा उत्तम असून, त्यामुळेच हा प्रकल्प येथे आला तर दहा हजार लोकांना रोजगार मिळेल म्हणून मी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत अ‍ॅक्रॉस द टेबल चर्चेत जमिनी देण्यात आल्या. प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी यासाठी मी पाठपुरावा केला. कंपनीच्या अधिकाºयांना घेऊन जिल्हाधिकाºयांकडे बैठका घेतल्या तशा मंत्री आणि सचिवांकडे बैठका घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.  परंतु त्यानंतर शासन आणि प्रशासन असे सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या चार वर्षांत मंत्री सचिव किंवा अगदी जिल्हाधिकाºयांकडे देखील बैठका झाल्या नाही असे सांगून ते म्हणाले की, या ठिकाणी काही प्रमाणात काम सुरू झाले तेव्हा युुनियनच्या नेत्यांनी देखील खूप त्रास दिला. मी माझ्यापरीने कंपन्यांना पाठबळ दिले. परंतु आता माजी आमदार म्हणून काय करणार? असा हतबल प्रतिप्रश्न त्यांनी केला. लोकांनी साथ दिली असती तरी मी काही तरी करू शकलो असतो, असेही ते म्हणाले.

टॅग्स :MIDCएमआयडीसी