शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चार वर्षांतील तापमानाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:47 IST

शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही;

नाशिक : शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही; मात्र यावर्षी एप्रिल महिनाअखेर ४१.७ अंश इतके तापमान नोंदविले गेल्यामुळे नाशिक करांच्या जिवाची काहिली झाली. शहरात उन्हाचा कहर नाशिककरांनी अनुभवला. मालेगावमध्ये ४२.६ अंश इतके तापमान नोंदविले गेले.मागील बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहे. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीवर पोहचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काही अंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारी अचानकपणे वातावरणात उष्मा वाढला व वाऱ्याची गती मंदावल्याने मागील चार वर्षांपेक्षा अधिक ४१.७ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा पोहचला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही.  सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण कमाल तापमानासोबत किमान तापमानाचा पारादेखील मागील चार वर्षांपासून चढता आहे. किमान तापमान शुक्रवारी २३.२ अंश इतके नोंदविले गेले.एप्रिलअखेर प्रखर उन्हाची तीव्रता नागरिक अनुभवत आहेत. १३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.७ अंशांपर्यंत गेले होते. आठवडाभरानंतर तापमानाने चाळिशी गाठली आहे. २८ मार्च रोजी या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.४ इतके कमाल तापमान नोंदविले गेले; मात्र ही नोंद शुक्रवारी मागे पडली. ४१.७ अंशांपर्यंत कमाल तापमान पोहचल्याने नाशिककर उन्हाच्या चटक्याने अक्षरश: भाजून निघाले.आठवड्याचे कमाल तापमान१९ एप्रिल : ३७.३२० एप्रिल : ३८.०२१ एप्रिल : ३७.७२२ एप्रिल : ३८.२२३ एप्रिल : ४०.१२४ एप्रिल : ४०.९२५ एप्रिल : ४०.५

टॅग्स :TemperatureतापमानEnchroachmentअतिक्रमण