शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

चार हजार क्युसेकने झेपावले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST

नाशिक: गंगापूर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात ...

नाशिक: गंगापूर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सोमवारी सुमारे चार हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी नदीत प्रवाहित करण्यात आल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसल्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ९७ टक्के इतके भरले आहे. पावसाचा जोर सायंकाळी ओसरला असला तरी सायंकाळ नंतर ४००९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. रविवारी दिवसभर १५२० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी त्यामध्ये वाढ होऊन एकूण ४००९ क्युसेक वेगाने पाणी नदीत प्रवाहित करण्यात आले. म्हणजेच दिवसभरात २४८९ इतका विसर्ग करण्यात आलेला आहे.

गंगापूर धरणाची पातळी वाढत असली तरी समाधानकारक पाऊस नसल्याने तसेच समूहातील अन्य धरणांची पातळीदेखील स्थिर असल्यामुळे धरणातून शनिवारपर्यंत विसर्ग करण्यात आलेला नव्हता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक झाल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. सोमवारी दिवसभरात टप्क्याटप्क्याने पाणी प्रवाहित करण्यात आले. पावसाचा जोर लक्षात घेता पाच हजार क्युसेकपर्यंत विसर्ग जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४००९ क्युसेक इतक्या वेगाने पाणी सुरू होते.

--इन्फो--

विसर्ग वेळ

१५२० स. ६ वा.

२५५७ स. ९ वा

२५५७ दु. १२ वा.

३५०० दु. २ वा.

३६०८ दु. ३ वा.

४००९ दु. ४ वा.\

--इन्फो--

नदीकाठावरील टपऱ्यांमध्ये पाणी

गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे काठावरील अनेक टपऱ्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या मालाचे नुकसान झाले. पाणी सातत्याने वाढत असल्यामुळे विक्रेत्यांनी तातडीने आपली दुकाने हटविण्यास प्रारंभ केला. साठलेल्या पाण्यातून दुकाने हलविण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागले. काठावर राहणाऱ्यांनीही वेळीच आपले संसारोपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी हलविले.