शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चार हजार क्युसेकने झेपावले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST

नाशिक: गंगापूर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात ...

नाशिक: गंगापूर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सोमवारी सुमारे चार हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी नदीत प्रवाहित करण्यात आल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसल्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ९७ टक्के इतके भरले आहे. पावसाचा जोर सायंकाळी ओसरला असला तरी सायंकाळ नंतर ४००९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. रविवारी दिवसभर १५२० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी त्यामध्ये वाढ होऊन एकूण ४००९ क्युसेक वेगाने पाणी नदीत प्रवाहित करण्यात आले. म्हणजेच दिवसभरात २४८९ इतका विसर्ग करण्यात आलेला आहे.

गंगापूर धरणाची पातळी वाढत असली तरी समाधानकारक पाऊस नसल्याने तसेच समूहातील अन्य धरणांची पातळीदेखील स्थिर असल्यामुळे धरणातून शनिवारपर्यंत विसर्ग करण्यात आलेला नव्हता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक झाल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. सोमवारी दिवसभरात टप्क्याटप्क्याने पाणी प्रवाहित करण्यात आले. पावसाचा जोर लक्षात घेता पाच हजार क्युसेकपर्यंत विसर्ग जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४००९ क्युसेक इतक्या वेगाने पाणी सुरू होते.

--इन्फो--

विसर्ग वेळ

१५२० स. ६ वा.

२५५७ स. ९ वा

२५५७ दु. १२ वा.

३५०० दु. २ वा.

३६०८ दु. ३ वा.

४००९ दु. ४ वा.\

--इन्फो--

नदीकाठावरील टपऱ्यांमध्ये पाणी

गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे काठावरील अनेक टपऱ्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या मालाचे नुकसान झाले. पाणी सातत्याने वाढत असल्यामुळे विक्रेत्यांनी तातडीने आपली दुकाने हटविण्यास प्रारंभ केला. साठलेल्या पाण्यातून दुकाने हलविण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागले. काठावर राहणाऱ्यांनीही वेळीच आपले संसारोपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी हलविले.