शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मालेगावच्या अल्पवयीन चार मुली पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: June 19, 2017 04:42 IST

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार ते पाच वयोगटातील चार मुली १८ जून रोजी अकोटात आढळून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार ते पाच वयोगटातील चार मुली १८ जून रोजी अकोटात आढळून आल्या. शहर पोलिसांनी राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये या चारही मुली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सदर अल्पवयीन मुली या अकोटात आल्या कशा, या महिलेच्या घरी त्या राहिल्या कशा, याबाबत पोलिसांनी तपास करणे गरजेचे झाले. अकोट शहर पोलिसांनी शहरातील काही भागात शोधमोहीम राबविली. यावेळी अमिनपुरा या ठिकाणी बाहेरगावावरील चार ते पाच अल्पवयीन मुली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून रशिदाबी यांच्या घरी पोलिसांनी चौकशी केली असता यावेळी जयनाबी तहरीन आसीफ (१२), कुलसुम तहरीन आसीफ (९), मयीम तहरीन आसीफ (५) व मिसबा अजीम खान (८) या आढळून आल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता त्या मालेगाव येथून आल्या असल्याचे समजले. मालेगाव येथून काही मुलीसुद्धा बेपत्ता झाल्या असल्याची माहिती अकोट पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शहानिशा करण्याकरिता अकोट शहर पोलिसांनी मालेगाव पोलिसांशी संपर्क साधला त्या बेपत्ता असल्याची नोंद असल्याचे समोर आले. मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, पोलीस निरीक्षक सी.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, जितेंद्र कातखेडे, अमरदीप गुरू, वीरेंद्र लाड, दीपाली देशमुख यांनी केली. याबाबत मालेगाव पोलिसांचे पथक मुलींना ताब्यात घेण्याकरिता येत असल्याचे ठाणोदार सी.टी. इंगळे यांनी सांगितले.