शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

दोन दिवसांत चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 4, 2017 00:24 IST

वाढत्या घटना : उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

 नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना कायम असून, गेल्या दोन दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्येच्या घटनांची संख्या तीसच्या घरात पोहोचली आहे. सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी नैराश्येत सापडले असताना शासकीय व प्रशासकीय पातळीवर मात्र हात बांधण्यापलीकडे काहीच केले जात नाही. सोमवारी १ मे महाराष्ट्रदिनी निफाड ताालुक्यातील उगाव येथे राहणारे शंकर सखाराम जगताप (५२) या शेतकऱ्याने गळफास घेऊन, तर बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील नितीन कडू बिरारी (२५) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना कायम असताना दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. सुरगाणा तालुक्यातील हनुमंतपाडा येथील भगवान नानू गावित (४५) या शेतकऱ्याने अंगावर घासलेट ओतून स्वत:ला पेटवून घेतले, त्याला उपचारार्थ हलविले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. या चौघांच्या आत्महत्येने जिल्ह्णात आजवर ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्यात तरुण शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, प्रशासकीय पातळीवर शेतकरी आत्महत्येची आकडेवारी गोळा करण्यापलीकडे काहीच केले जात नाही. शासनाने गेल्या वर्षीच शेतकरी आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शासकीय योजनांतून मदत करण्याबरोबरच कर्जबाजारी शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी मेळावे भरविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विशेष म्हणजे सुरगाणा या आदिवासी भागातही आत्महत्येचे लोण पसरू लागले असून, प्रशासकीय पातळीवर मात्र याबाबत उदासीनता आहे.शेतकरी महिलेची आत्महत्याजिल्ह्णातील निफाड तालुक्यात एका शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना यंदा पहिल्यांदाच घडली आहे. गेल्या वर्षीही एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली होती. निफाड तालुक्यातील गाजरेवाडी येथे राहणारी अश्विनी संदीप गाजरे हिने माहेर धारणगाव येथे वडिलांच्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली तिच्या नावावर गाजरेवाडी येथे शेती नाही; मात्र वडिलांच्या नावावर शेती आहे. त्यामुळे प्रशासनाने गाजरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सविस्तर अहवाल मागविला आहे. शेतकऱ्याचे विष प्राशनजायखेडा/द्याने : कर्जाचा वाढता बोजा त्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान यामुळे करंजाड येथील शेतकरी सुनील शांताराम देवरे (३१) यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शांताराम देवरे यांच्या नावावर ३ एकर शेती असून ते कुटूंबाचा उदरिनर्वाह करतात. त्याच्यावर करंजाड विविध कार्यकारी सोसायटीचे १ लाख ५० हजार रु पयांचे पिक कर्ज तसेच ४० हजारांचे सोने तारण कर्ज होते. गारपीटमुळे त्यांच्या पिकाचे नुकसान झाले. या नैराश्यातून सुनील देवरे यांनी जीवन यात्रा संपवली. त्याच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परीवार आहे.