शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ग्रामीण भागात पाच वर्षांत साडेचार हजार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:14 IST

--- नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत कमालीची उदासीनता व निरक्षरता पहावयास मिळते. मागील पाच वर्षांमध्ये ...

---

नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत कमालीची उदासीनता व निरक्षरता पहावयास मिळते. मागील पाच वर्षांमध्ये नाशिकच्या ग्रामीण भागात तब्बल ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये सुमारे ४ हजार ७०५ लोकांना अप‌घातात आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा अत्यंत चिंताजनक असून, रस्ता सुरक्षा अभियानात शहराबरोबरच ग्रामीण जनतेमध्येही व्यापक व प्रभावीपणे जनजागृती करण्याची गरज आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वाहनांची संख्या कमी असते; परिणामी रस्त्यांवर वर्दळही अत्यल्प असते, तरीदेखील ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. नाशिक ग्रामीणमध्ये २०१५साली तब्बल २ हजार२४० अपघात झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. तसेच सर्वाधिक ८२४ अपघाती मृत्यू २०१८साली झाले होते. गेल्यावर्षी ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अपघातात ८०१ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ग्रामीण भागातून राष्ट्रीय, राज्य व अन्य महामार्ग जातात. या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रस्ते सुरक्षा अभियानात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य मार्ग प्राधिकरणाने अवजड वाहनचालकांसह हलके वाहन भरधाव दामटविणाऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), ग्रामीण वाहतूक पोलिसांसमोर आहे; मात्र यासाठी संबंधितांकडून केवळ दंडात्मक कारवाईचा (वसुली) उपाय अंमलात आणला जातो. दंड वसूल झाला की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’ असेच चित्र रस्त्यांवर पहावयास मिळते. राज्य, राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांना जोडणाऱ्या विविध गाव, वस्ती, मळ्यांमध्ये जाणारे जोडरस्ते त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वाहतूक नियमांची पायमल्ली करत केली जाणारी सार्वजनिक प्रवासी वाहतूक, शेतमालाची वाहतूक अशा अनेकविध कारणांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असते.

---इन्फो--

रस्त्यांची दुर्दशा मोठे कारण

ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुर्दशा हे अपघातांमागील मोठे कारण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षानुवर्षे रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही आणि खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली दिसते. जिल्ह्यातील विविध तालु्क्यांमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांची बिकट अवस्था झालेली असून, वारंवार तक्रार करूनदेखील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने अपघातांचा आलेख वाढतच आहे.

----इन्फो----

अपघातप्रवण स्थळांच्या सुरक्षेकडे काणाडोळा

ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवर असलेल्या अपघातप्रवण स्थळांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. अपघाती स्थळ सुरक्षित करण्याबाबत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने वर्षानुवर्षांपासून अपघाती स्थळ, धोकादायक वळणांवर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

---इन्फो--

वर्षनिहाय मृत्यूचे प्रमाण असे...

२०१५- ७९०

२०१६- ७७४

२०१७- ७३३

२०१८- ८२४

२०१९- ७८३

२०२०- ८०१

----इन्फो--

अपघातांची टक्केवारी अशी...

राष्ट्रीय महामार्ग : ३२%

राज्य महामार्ग : २०%

अन्य मार्ग : ४८%

---इन्फो--

वाहनांच्या प्रकारानुसार अपघात असे...

मोटारसायकल : ५०%

चारचाकी कार : २६%

बस : २.११%

अन्य वाहने : २१.७६%

---इन्फो--

तालुकानिहाय अपघातांची टक्केवारी

मालेगाव : १७ %

सिन्नर : १४%

इगतपुरी : ३१%

त्र्यंबकेश्वर : ४%

निफाड : १२ %

येवला : ५%

नाशिक : ३%

---

फोटो क्र : १०पीएचजेएन६२ : आडगावजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील छायाचित्र :