शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पाच वर्षांत साडेचार हजार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:14 IST

--- नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत कमालीची उदासीनता व निरक्षरता पहावयास मिळते. मागील पाच वर्षांमध्ये ...

---

नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत कमालीची उदासीनता व निरक्षरता पहावयास मिळते. मागील पाच वर्षांमध्ये नाशिकच्या ग्रामीण भागात तब्बल ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये सुमारे ४ हजार ७०५ लोकांना अप‌घातात आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा अत्यंत चिंताजनक असून, रस्ता सुरक्षा अभियानात शहराबरोबरच ग्रामीण जनतेमध्येही व्यापक व प्रभावीपणे जनजागृती करण्याची गरज आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वाहनांची संख्या कमी असते; परिणामी रस्त्यांवर वर्दळही अत्यल्प असते, तरीदेखील ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. नाशिक ग्रामीणमध्ये २०१५साली तब्बल २ हजार२४० अपघात झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. तसेच सर्वाधिक ८२४ अपघाती मृत्यू २०१८साली झाले होते. गेल्यावर्षी ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अपघातात ८०१ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ग्रामीण भागातून राष्ट्रीय, राज्य व अन्य महामार्ग जातात. या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रस्ते सुरक्षा अभियानात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य मार्ग प्राधिकरणाने अवजड वाहनचालकांसह हलके वाहन भरधाव दामटविणाऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), ग्रामीण वाहतूक पोलिसांसमोर आहे; मात्र यासाठी संबंधितांकडून केवळ दंडात्मक कारवाईचा (वसुली) उपाय अंमलात आणला जातो. दंड वसूल झाला की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’ असेच चित्र रस्त्यांवर पहावयास मिळते. राज्य, राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांना जोडणाऱ्या विविध गाव, वस्ती, मळ्यांमध्ये जाणारे जोडरस्ते त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वाहतूक नियमांची पायमल्ली करत केली जाणारी सार्वजनिक प्रवासी वाहतूक, शेतमालाची वाहतूक अशा अनेकविध कारणांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असते.

---इन्फो--

रस्त्यांची दुर्दशा मोठे कारण

ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुर्दशा हे अपघातांमागील मोठे कारण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षानुवर्षे रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही आणि खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली दिसते. जिल्ह्यातील विविध तालु्क्यांमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांची बिकट अवस्था झालेली असून, वारंवार तक्रार करूनदेखील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने अपघातांचा आलेख वाढतच आहे.

----इन्फो----

अपघातप्रवण स्थळांच्या सुरक्षेकडे काणाडोळा

ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवर असलेल्या अपघातप्रवण स्थळांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. अपघाती स्थळ सुरक्षित करण्याबाबत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने वर्षानुवर्षांपासून अपघाती स्थळ, धोकादायक वळणांवर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

---इन्फो--

वर्षनिहाय मृत्यूचे प्रमाण असे...

२०१५- ७९०

२०१६- ७७४

२०१७- ७३३

२०१८- ८२४

२०१९- ७८३

२०२०- ८०१

----इन्फो--

अपघातांची टक्केवारी अशी...

राष्ट्रीय महामार्ग : ३२%

राज्य महामार्ग : २०%

अन्य मार्ग : ४८%

---इन्फो--

वाहनांच्या प्रकारानुसार अपघात असे...

मोटारसायकल : ५०%

चारचाकी कार : २६%

बस : २.११%

अन्य वाहने : २१.७६%

---इन्फो--

तालुकानिहाय अपघातांची टक्केवारी

मालेगाव : १७ %

सिन्नर : १४%

इगतपुरी : ३१%

त्र्यंबकेश्वर : ४%

निफाड : १२ %

येवला : ५%

नाशिक : ३%

---

फोटो क्र : १०पीएचजेएन६२ : आडगावजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील छायाचित्र :