शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

ग्रामीण भागात पाच वर्षांत साडेचार हजार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:14 IST

--- नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत कमालीची उदासीनता व निरक्षरता पहावयास मिळते. मागील पाच वर्षांमध्ये ...

---

नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत कमालीची उदासीनता व निरक्षरता पहावयास मिळते. मागील पाच वर्षांमध्ये नाशिकच्या ग्रामीण भागात तब्बल ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये सुमारे ४ हजार ७०५ लोकांना अप‌घातात आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा अत्यंत चिंताजनक असून, रस्ता सुरक्षा अभियानात शहराबरोबरच ग्रामीण जनतेमध्येही व्यापक व प्रभावीपणे जनजागृती करण्याची गरज आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वाहनांची संख्या कमी असते; परिणामी रस्त्यांवर वर्दळही अत्यल्प असते, तरीदेखील ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. नाशिक ग्रामीणमध्ये २०१५साली तब्बल २ हजार२४० अपघात झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. तसेच सर्वाधिक ८२४ अपघाती मृत्यू २०१८साली झाले होते. गेल्यावर्षी ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अपघातात ८०१ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ग्रामीण भागातून राष्ट्रीय, राज्य व अन्य महामार्ग जातात. या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रस्ते सुरक्षा अभियानात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य मार्ग प्राधिकरणाने अवजड वाहनचालकांसह हलके वाहन भरधाव दामटविणाऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), ग्रामीण वाहतूक पोलिसांसमोर आहे; मात्र यासाठी संबंधितांकडून केवळ दंडात्मक कारवाईचा (वसुली) उपाय अंमलात आणला जातो. दंड वसूल झाला की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’ असेच चित्र रस्त्यांवर पहावयास मिळते. राज्य, राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांना जोडणाऱ्या विविध गाव, वस्ती, मळ्यांमध्ये जाणारे जोडरस्ते त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वाहतूक नियमांची पायमल्ली करत केली जाणारी सार्वजनिक प्रवासी वाहतूक, शेतमालाची वाहतूक अशा अनेकविध कारणांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असते.

---इन्फो--

रस्त्यांची दुर्दशा मोठे कारण

ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुर्दशा हे अपघातांमागील मोठे कारण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षानुवर्षे रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही आणि खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली दिसते. जिल्ह्यातील विविध तालु्क्यांमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांची बिकट अवस्था झालेली असून, वारंवार तक्रार करूनदेखील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने अपघातांचा आलेख वाढतच आहे.

----इन्फो----

अपघातप्रवण स्थळांच्या सुरक्षेकडे काणाडोळा

ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवर असलेल्या अपघातप्रवण स्थळांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. अपघाती स्थळ सुरक्षित करण्याबाबत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने वर्षानुवर्षांपासून अपघाती स्थळ, धोकादायक वळणांवर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

---इन्फो--

वर्षनिहाय मृत्यूचे प्रमाण असे...

२०१५- ७९०

२०१६- ७७४

२०१७- ७३३

२०१८- ८२४

२०१९- ७८३

२०२०- ८०१

----इन्फो--

अपघातांची टक्केवारी अशी...

राष्ट्रीय महामार्ग : ३२%

राज्य महामार्ग : २०%

अन्य मार्ग : ४८%

---इन्फो--

वाहनांच्या प्रकारानुसार अपघात असे...

मोटारसायकल : ५०%

चारचाकी कार : २६%

बस : २.११%

अन्य वाहने : २१.७६%

---इन्फो--

तालुकानिहाय अपघातांची टक्केवारी

मालेगाव : १७ %

सिन्नर : १४%

इगतपुरी : ३१%

त्र्यंबकेश्वर : ४%

निफाड : १२ %

येवला : ५%

नाशिक : ३%

---

फोटो क्र : १०पीएचजेएन६२ : आडगावजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील छायाचित्र :